शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सांगली जिल्हा परिषद, महापालिका अन् सात नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रतीक्षा; सरकारविरोधात नाराजीचा सूर

By अशोक डोंबाळे | Updated: December 13, 2024 18:22 IST

जिल्हाभरात विकासकामांना लागला 'ब्रेक' 

अशोक डोंबाळे

सांगली : विधानसभा निवडणूक आटोपली असून, आता दीड ते तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या आणि सात नगरपालिकांच्या निवडणुकीकडे इच्छुक उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका वेळेत होतात. पण ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीड ते तीन वर्षे होत नसल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांमधून नेत्यांसह सरकारविरोधात नाराजीचा सूर आहे.सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील रखडलेल्या निवडणुकांच्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे पुढील वर्षात निवडणुका होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपलेला आहे, तसेच १० पंचायत समित्या आणि सात नगरपालिकांवर दोन ते तीन वर्षांपासून प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवरही प्रशासक नियुक्त आहे. विविध कारणांसाठी निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत.मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. त्यामुळे, विजयाचा 'टेम्पो' कायम ठेवण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदा, महानगर पालिका, नगरपालिका, नगर पंचायती यांच्या निवडणुका सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील इच्छुक कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या, महापालिका आणि सात नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे. नवीन वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांवर प्रशासक राजजिल्ह्यातील सात नगरपालिकांचा कार्यकाळ संपला आहे. या सर्वच नगरपालिकांवर प्रशासक राज सुरू आहे. यामध्ये इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, पलूस, जत आणि शिराळा नगरपालिकांचा समावेश आहे. प्रशासक राजमुळे या शहरातील विकासकामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे या निवडणुकांची प्रतीक्षा आहे.

जिल्हाभरात विकासकामांना लागला 'ब्रेक' जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २२ मार्च २०२१ मध्ये संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक नियुक्त आहेत. प्रशासकीय कामाला गती असली तरी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात अधिकाऱ्यांनाही अडचणी येत आहेत. विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने पात्र लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे, विधानसभा झाल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुका व्हाव्यात, अशी इच्छुकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024