युवक काँग्रेसची जोरदार रॅली, पुतळा दहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:02+5:302020-12-09T04:22:02+5:30
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला फोटो ०८ सांगली रॅली स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय ...

युवक काँग्रेसची जोरदार रॅली, पुतळा दहनाचा प्रयत्न
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला
फोटो ०८ सांगली रॅली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रॅलीद्वारे बंदचे आवाहन केेले
फोटो ०८ मार्केट यार्ड
बंदमुळे बाजार समिती आवारात असा शुकशुकाट होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली
: देशव्यापी ‘बंद’ला सांगलीकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. सर्व प्रमुख
बाजारपेठांसह बाजार समितीही शंभर टक्के बंद राहिली. भाजपव्यतिरिक्त अन्य
पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरभर रॅली काढून शक्तिप्रदर्शनाचा
प्रयत्न केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शने केली. सकाळी काँग्रेस भवनसमोरुन रॅली निघाली. जिल्हाधिकारी
कार्यालयाकडे कार्यकर्ते रवाना झाले. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम
यांनी नेतृत्व केले. मोर्चामध्ये नेतृत्व जितेश कदम, युवक काँग्रेसचे
प्रभारी प्रदीप कुमार सिंधव, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज
मोरे, सचिव जयदीप शिंदे, जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, प्रदेश सचिव इंद्रजित
साळुंखे, उपाध्यक्ष संदीप जाधव, संभाजी पाटील, अयुब निशाणदार आदी सहभागी
होते. कार्यकर्त्यांनी पुतळा दहनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी विरोध
केला, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पुतळा फाडून पायदळी तुडविला.
आंदोलनात
सुजित लकडे, उत्कर्ष खाडे, सुबोध पवार, धनराज सातपुते, शरीफ सय्यद, स्वराज
पाटील, अण्णासाहेब नरगच्चे, श्रीनाथ देवकर, अमोल पाटील, रवींद्र मगदूम,
अल्ताफ मकानदार, वैभव पाटील, कैलास रजपूत, उदय पाटील, अर्जुन जाधव, सुभाष
सावंत, सुरेश साळुंखे, अशोक ओमासे, विलास राजपूत हेदेखील सहभागी झाले. स्वाभिमानी
शेतकरी संघटनेसह किसान सभा, बांधकाम मजूर संघटना आदींनीही शहरा रॅली
काढली. महेश खराडे, उमेश देशमुख, डॉ. संजय पाटील, विकास मगदूम, राहुल
पाटील, तोहीद शेख, मुनीर मुल्ला, शंभोराज काटकर, शेवंता वाघमारे आदी सहभागी
झाले. गणपती पेठ, कापड पेठ, मारुती रस्ता, शिवाजी पुतळा परिसरातून रॅली
निघाली. स्टेशन चौकात पोलिसांनी रॅली अडविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी
कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठिय्या मारला. काही वेळाने रॅली पुन्हा
मार्गस्थ झाली.
चौकट
मिरच्या देऊन गांधीगिरी
काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. आंदोलकांनी त्यांना लाल मिरच्या देऊन गांधीगिरी
केली. दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी वादही झाला.
-----------