शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचे निधन; मिरजेत अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 14:30 IST

जेल फोडण्याच्या घटनेचा अखेरचा शिलेदार हरपला

सांगली : स्वातंत्र्यसंग्रामातील ज्येष्ठ क्रांतिकारी व ब्रिटीश काळात सांगलीचा जेल फोडण्याच्या घटनेतील अखेरचे शिलेदार जयराम विष्णुपंत कुष्टे (वय १0२) यांचे रविवारी सकाळी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.कोकणातल्या राजापूर तालुक्यातील चुना कोळवणमध्ये २४ फेब्रुवारी १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याचठिकाणी त्यांचे दुसरीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर तिसरीसाठी त्यांना वेंगुर्ला तालुक्यातील कोंबुरले येथे त्यांच्या बहिणीकडे पाठविण्यात आले. तिसरीतून त्यांनी शिक्षणाला राम राम केला. त्यानंतर सोनारकाम शिकण्यासाठी ते कोल्हापूरला आले. त्याठिकाणी त्यांनी प्रज्ञापरिषदेत सहभाग घेतला. कोल्हापुरातच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. कोल्हापुरातच त्यांची व वसंतदादा पाटील यांची ओळख झाली आणि त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन ते सांगलीत आले.कुष्टे यांनी स्वातंत्र्यसंग्रामात दिलेले योगदान मोठे आहे. १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनातील ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणेला मंत्र मानून सांगलीतील ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकार्य सुरू केले. त्यातील जयराम कुष्टे हे महत्त्वाचे शिलेदार होते. या क्रांतिकार्यामुळे त्यावेळी काही जणांना अटक झाली होती. त्यात वसंतदादा पाटील, हिंदुराव पाटील, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलींग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावंत, मारुती आगलावे, अण्णासाहेब पत्रावळे, बाबुराव जाधव, विठ्ठल शिंदे, जयराम बेलवलकर, दत्तात्रय पाटील, नामदेवराव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबुराव पाचोरे, तात्या सोनीकर यांचा समावेश होता. या स्वातंत्र्यसैनिकांनी २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडला होता. यात जयराम कुष्टेही आघाडीवर होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व अन्य सहकाºयांसमवेत त्यांनी या थरारक घटनेत पुढाकार घेतला होता.क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. (बापू) लाड, हुतात्मा किसन अहिर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांबरोबर त्यांनी काम केले. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने बक्षिस ठेवले होते. बारा वर्षे ते भूमिगत राहिले होते. त्यावेळी ते अकलूज येथे शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाड्यात वास्तव्यास होते.स्वातंत्र्यानंतर ते सांगलीतच स्थायिक झाले. सामान्य माणसाप्रमाणे ते आयुष्य जगले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.