शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'पीएम केअर निधी'तून सांगली जिल्ह्याला मिळालेली 'व्हेंटिलेटर्स' झाले भंगार, कोट्यवधी रुपये मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:24 IST

मिळालेली व्हेंटिलेटर्स सुमार दर्जा आणि तांत्रिक बिघाडांमुळे फेकून द्यावे लागले आहेत. शासनाला परत पाठवायचे की भंगारात घालायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.

सांगली : कोरोनाकाळात पीएम केअर निधीतून जिल्ह्याला मिळालेले व्हेंटिलेटर्स सध्या भंगार स्वरूपात पडून आहेत. सुमार दर्जा आणि तांत्रिक बिघाडांमुळे फेकून द्यावे लागले आहेत. शासनाला परत पाठवायचे की भंगारात घालायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.

एप्रिल २०२१ मध्ये पीएम केअरमधून जिल्ह्याला तब्बल १५२ व्हेंटिलेटर्स मिळाले होते. शासकीय रुग्णालये तसेच काही खासगी कोरोना रुग्णालयांना वितरित करण्यात आले होते. पण बरेच व्हेंटिलेटर्सचे बिनकामाचे ठरले. आरोग्य प्रशासनाने स्थानिक तंत्रज्ञांच्या मदतीने जुगाड करीत सुरू केले, रुग्णांना ऑक्सिजन देऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांची दुरुस्ती स्थानिक स्तरावर शक्य नव्हती; पण कंपनीकडे परत पाठविल्यास लवकर मिळण्याची शक्यताही नव्हती. कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात काहीही करून वापरात आणण्याचा एकमेव पर्याय होता. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या जैववैद्यकीय (बायोमेडिकल) अभियंत्यांनी कसब पणाला लावून व्हेंटिलेटर्समध्ये प्राण फुंकले.

सेन्सर बंद, सॉफ्टवेअरही जुळेना

काही व्हेंटिलेटरच्या सेन्सरमध्ये बिघाड आहेत. सॉफ्टवेअरमध्येही समस्या आहेत. मिरज कोविड रुग्णालयात २० व्हेंटिलेटर्स बसवले होते, त्यापैकी अनेकांना सॉफ्टवेअरची समस्या होती. तास-दोन तासांतच बंद पडायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागले. दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठविणे गैरसोयीचे होते. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक रुग्णालयाला जैववैद्यकीय अभियंते कंत्राटी स्वरूपात नेमण्याचे आदेश दिले. त्याच्याकडून जुगाड करून रुग्णालयांनी वेळ मारून नेली. कवठेमहांकाळ, तासगाव आदी ग्रामीण रुग्णालयांत दुरुस्तीला तंत्रज्ञ नव्हते. त्यांनी सांगली-मिरजेतून मिनतवाऱ्या करून तंत्रज्ञ मिळविले.

जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा

पीएम केअरसाठी लोकांनी भरभरून पैसा दिला; पण त्यातून हलक्या दर्जाची व्हेंटिलेटर्स देऊन कंपन्यांनी उखळ पांढरे करून घेतले. मिरज शासकीय रुग्णालयासह ठिकठिकाणी व्हेंटिलेटर्स वापराविना पडून आहेत. जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या