शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत विद्यार्थ्यांची शाकाहारी दिंडी : शाकाहार प्रसारासाठीचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 19:50 IST

शाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देआज संमेलन -नियमसागर महाराज म्हणाले की, शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते.

सांगली : शाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले. रविवारी १४ आॅक्टोबर रोजी येथील नेमिनाथनगरमध्ये होणाºया शाकाहार संमेलनानिमित्त ही दिंडी काढण्यात आली होती.ंिदंडीची सुरुवात नेमिनाथनगर येथे चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आली.

यावेळी राजमती गर्ल्स हायस्कूल अध्यक्ष महावीर शेटे, कळंत्रेआक्का प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन चौगुले, राजू चौगुले, सुहास पाटील, वसंत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष देसाई, सचिन आळतेकर, सागर पाटील आदी उपस्थित होते. एक हजारहून अधिक विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते.

या दिंडीत महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेली पालखी अग्रभागी होती. फळे, भाजीपाला यांच्या प्रतिमांनी पालखी सजविण्यात आली होती. शहरातून ही दिंडी फिरून नेमिनाथनगर येथे आली. याठिकाणी मुनिश्री सागर महाराज, नियमसागर महाराज यांच्या उपस्थितीत नववीच्या विद्यार्थिनीने राजू कांबळे रचित शाकाहार गीत गायले. यावेळी मोहन चौगुले, महावीर शेटे, मुसा तांबोळी, मीनाक्षी वाझे, सुनील पाटील, प्रमोद खंजिरे, आनंद पाटील, राजू कांबळे, प्रसन्न शेटे, अमर पाटील, प्रा. डॉ. शोभा पाटील, अजिंक्य पाटील यांचा दिंडीच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना मुनिश्री सागर महाराज यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, शाकाहार हाच सर्वोत्कृष्ट आहार आहे. शाकाहारामुळे बुद्धिमत्ता वाढते, जीवन उन्नत होते. शाकाहारी जीव ओठाने, तर मांसाहारी जीव जिभेने पाणी प्राशन करतो, हे स्पष्ट केले. प्रत्येक जीवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मांसाहार सेवनाने अनेक विकार उत्पन्न होतात. त्यामुळे सर्वांनी शाकाहार व त्याचा प्रचार, प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नियमसागर महाराज म्हणाले की, शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते. आज बाजारात अनेक भेसळयुक्त घातक पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हा प्रकार मनुष्यासाठी धोकादायक आहे. अनेक महापुरुषांनी अहिंसेचा संदेश देताना त्याप्रमाणे वर्तन ठेवले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही शाकाहार दिंडी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, अहिंसेचे मूळ शाकाहार हेच आहे. जैन धर्म व अहिंसेचा जवळचा संबंध आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाने शाकाहाराचे महत्त्व ओळखले आहे. आभार सुनील पाटील यांनी मानले.

देशातील पहिलेच संमेलनसंयम स्वर्ण पावन वर्षायोगनिमित्त रविवारी देशातील अशाप्रकारचे पहिलेच शाकाहार संमेलन आयोजित केले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता कल्पद्रुम मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ‘शाकाहार सर्वोत्तम आहार’ या विषयावर डॉ. कल्याण गंगवाल (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ‘आयुर्वेद व शाकाहार’ विषयावर डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर) व बौध्द साहित्य व शाकाहार विषयावर डॉ. संघप्रकाश दुड्डे (सोलापूर) यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपSangliसांगली