शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

सांगलीत विद्यार्थ्यांची शाकाहारी दिंडी : शाकाहार प्रसारासाठीचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 19:50 IST

शाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देआज संमेलन -नियमसागर महाराज म्हणाले की, शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते.

सांगली : शाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले. रविवारी १४ आॅक्टोबर रोजी येथील नेमिनाथनगरमध्ये होणाºया शाकाहार संमेलनानिमित्त ही दिंडी काढण्यात आली होती.ंिदंडीची सुरुवात नेमिनाथनगर येथे चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आली.

यावेळी राजमती गर्ल्स हायस्कूल अध्यक्ष महावीर शेटे, कळंत्रेआक्का प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन चौगुले, राजू चौगुले, सुहास पाटील, वसंत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष देसाई, सचिन आळतेकर, सागर पाटील आदी उपस्थित होते. एक हजारहून अधिक विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते.

या दिंडीत महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेली पालखी अग्रभागी होती. फळे, भाजीपाला यांच्या प्रतिमांनी पालखी सजविण्यात आली होती. शहरातून ही दिंडी फिरून नेमिनाथनगर येथे आली. याठिकाणी मुनिश्री सागर महाराज, नियमसागर महाराज यांच्या उपस्थितीत नववीच्या विद्यार्थिनीने राजू कांबळे रचित शाकाहार गीत गायले. यावेळी मोहन चौगुले, महावीर शेटे, मुसा तांबोळी, मीनाक्षी वाझे, सुनील पाटील, प्रमोद खंजिरे, आनंद पाटील, राजू कांबळे, प्रसन्न शेटे, अमर पाटील, प्रा. डॉ. शोभा पाटील, अजिंक्य पाटील यांचा दिंडीच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना मुनिश्री सागर महाराज यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, शाकाहार हाच सर्वोत्कृष्ट आहार आहे. शाकाहारामुळे बुद्धिमत्ता वाढते, जीवन उन्नत होते. शाकाहारी जीव ओठाने, तर मांसाहारी जीव जिभेने पाणी प्राशन करतो, हे स्पष्ट केले. प्रत्येक जीवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मांसाहार सेवनाने अनेक विकार उत्पन्न होतात. त्यामुळे सर्वांनी शाकाहार व त्याचा प्रचार, प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नियमसागर महाराज म्हणाले की, शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते. आज बाजारात अनेक भेसळयुक्त घातक पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हा प्रकार मनुष्यासाठी धोकादायक आहे. अनेक महापुरुषांनी अहिंसेचा संदेश देताना त्याप्रमाणे वर्तन ठेवले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही शाकाहार दिंडी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, अहिंसेचे मूळ शाकाहार हेच आहे. जैन धर्म व अहिंसेचा जवळचा संबंध आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाने शाकाहाराचे महत्त्व ओळखले आहे. आभार सुनील पाटील यांनी मानले.

देशातील पहिलेच संमेलनसंयम स्वर्ण पावन वर्षायोगनिमित्त रविवारी देशातील अशाप्रकारचे पहिलेच शाकाहार संमेलन आयोजित केले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता कल्पद्रुम मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ‘शाकाहार सर्वोत्तम आहार’ या विषयावर डॉ. कल्याण गंगवाल (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ‘आयुर्वेद व शाकाहार’ विषयावर डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर) व बौध्द साहित्य व शाकाहार विषयावर डॉ. संघप्रकाश दुड्डे (सोलापूर) यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपSangliसांगली