शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँक घोटाळ्यास ‘सहकार’चा खो, स्थगितीचा सपाटा, अंतिम टप्प्यात येऊ सुनावणी रेंगाळली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 19:32 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणात कलम ८८ च्या चौकशीला आता सहकार विभागानेच खो घातला आहे. सहकारमंत्र्यांसमोर होत असलेल्या सुनावण्या, एकापाठोपाठ एक स्थगिती आदेश यामुळे प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन रेंगाळली आहे. 

सांगली - अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणात कलम ८८ च्या चौकशीला आता सहकार विभागानेच खो घातला आहे. सहकारमंत्र्यांसमोर होत असलेल्या सुनावण्या, एकापाठोपाठ एक स्थगिती आदेश यामुळे प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन रेंगाळली आहे. अवसायानातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रांवरील सुनावणी सुरू असताना, सर्वांनी म्हणणे सादर केले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तरीही वारंवार सहकारमंत्र्यांकडे होणारे अपिल, सहकारमंत्र्यांकडून येणारे स्थगिती आदेश यामुळे या प्रक्रियेला बाधा येत आहे. यापूर्वीही तत्कालिन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन अधिकाºयांना घोटाळ््यातून वगळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही वारंवार सहकारमंत्र्यांकडून असे आदेश येतच राहिले. विद्यमान सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे प्रकाश साठे आणि विजय घेवारे यांनी अपिल केले होते. त्यामुळे त्यांच्याबाबतीत आरोपपत्राचा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगितीचे आदेश सहकारमंत्र्यांनी काढले. मदन पाटील यांचे वारसदार असलेल्या जयश्रीताई पाटील, सोनिया होळकर आणि मोनिका पाटील तसेच तत्कालिन तज्ज्ञ संचालक बी. डी. चव्हाण यांनीही सहकारमंत्र्यांकडे अपिल दाखल केले आहे. अंतिम सुनावणीसाठी आता त्यांचेही अपिल सहकारमंत्र्यांपुढे ठेवण्यात आले आहे. याशिवाय आरोपपत्राच्या विरोधात ६ आणि जप्ती आदेशाविरोधात दोन अशा एकूण आठजणांनी पुणे येथील राज्य सहकारी अपिलीय न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे एकूणच ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर रेंगाळली आहे. सहकार विभागाच्या भूमिकेबद्दल आता साशंकता व्यक्त होत आहे. गतीने सुनावणी होण्याची व प्रकरणे निकालात काढण्याची भूमिका यापूर्वी अनेकदा सुभाष देशमुख यांनी मांडली होती. न्यायप्रविष्ट बाबींचा अडथळाही त्यांनी मांडला होता. अशा परिस्थितीत सहकार विभागाकडूनही स्थगितीचे आदेश येऊ लागल्याने एकूणच त्यांच्या भूमिकेतील संभ्रम लोकांसमोर येत आहे. वसंतदादा बँकेच्या घोटाळ््यातील रकमाही चौकशीतील विलंबामुळे यापूर्वी कमी झाल्या आहेत. अनेक प्रकरणे वगळण्यात आली होती. त्यामुळे आता चौकशीला विलंब झाल्यास यातील आणखी काही प्रकरणे वगळण्याची वेळ येऊ शकते.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रbankबँक