शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-शिवसेनेशी आघाडीचा ‘वंचित बहुजन’चा प्रस्ताव

By अविनाश कोळी | Updated: September 20, 2022 19:36 IST

राज्यात पावसाने सोयाबिन व मूगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतू विमा कंपन्यांनी २० ते २५ टक्के नुकसान गृहित धरले आहे.

सांगली - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांत काँग्रेस-शिवसेनेसोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्याबाबतचा प्रस्ताव दोन्ही पक्षांना दिला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी शिवसेनाकाँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला असला तरी त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कुणी बरोबर घेतले नाही, तरी आमची आघाडी या निवडणुका स्वबळावर लढेल. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतात तेव्हा त्याचा फायदा भाजपला होता. दोघे वेगवेगळे लढले तर भाजपला तोटा होत असल्याचे आतापर्यंतच्या निवडणुकीत पाहायला मिळाले आहे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला होता. एकनाथ शिंदे हे दुसरे उद्धव ठाकरे होते. पक्षात दुफळी निर्माण होणार नाही, नैराश्य येणार नाही, ही जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतू तेच पक्षाच्या नेत्याविरोधात बंड करुन सरकारमधून बाहेर पडले. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळू नये, अशी व्युहरचना श्रीमंत मराठ्यांची आहे.

राज्यात पावसाने सोयाबिन व मूगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतू विमा कंपन्यांनी २० ते २५ टक्के नुकसान गृहित धरले आहे. पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांची आणखी परीक्षा न पाहता विमा कंपन्यांना बोलावून नुकसानीची शंभर टक्के भरपाई देण्यास भाग पाडावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

"मोदी दहशत निर्माण करू पाहताहेत"

आंबेडकर म्हणाले की, सध्या देशाची वाटचाल राजेशाही, हुकुशाहीकडे सुरू आहे. पंडित नेहरुंनी शांततेसाठी कबुतरे सोडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्ते सोडले. यापूर्वी सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या माध्यमातून भीती दाखवली. आता तर चित्ते सोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना