शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा तालुक्यात आता प्रशासनाची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वाळवा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वाळवा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तालुका प्रशासनाला कारवाईची धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस, महसूल, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील दक्षता समित्यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, सध्या तालुक्यात कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे होणाऱ्या नियमबाह्य गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इस्लामपूर आणि आष्टा या शहरातही कारवाया वाढविण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दोन्ही शहरात चार पथकांची निर्मिती केली आहे. तालुक्यामध्ये १ एप्रिलपासून विनामास्क फिरणाऱ्या २९७२ जणांकडून १३ लाख ४६ हजार, मोटार वाहन अधिनियमाखाली ६२१३ वाहनधारकांकडून १६ लाख ८२ हजार, तर विनापरवाना दुकाने सुरू ठेवणाऱ्या १६६ जणांकडून १ लाख ६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोविड साथ नियमावलीचा भंग केल्याबद्दल २२२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात दक्षता समितीकडून १५ हजार रुपये दंड वसूल झाला आहे.

चाचण्या वाढवल्या

तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ५२ गावांमध्ये कक्ष करण्यात आले आहेत. कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवून आता दिवसाला सरासरी १३०० व्यक्तींच्या अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या जात असल्याचे सबनीस यांनी स्पष्ट केले.