शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

खानापूर तालुक्यात डाळिंब बागांवर नॉन ओव्हन पेपरचा वापर : रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 20:28 IST

काही ठिकाणी उशिरा छाटण्या घेतलेल्या डाळिंब बागांना स्थानिक बाजारपेठेत चालणारी चांगली फळधारणा झाली आहे. परंतु, सध्या ऊन, ढगाळ वातावरण आणि अनेक रोगांचा होणारा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे.

दिलीप मोहिते

विटा : रोगांचा प्रादुर्भाव व डाळिंबावर उन्हामुळे पडणारे चट्टे थांबवून फळांची गुणवत्ता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेडनेट किंवा नॉन ओव्हन पेपरचा वापर सुरू केलाआहे.त्या साहाय्याने झाडे व फळांना आवरण घातले आहे.

लालभडक डाळिंबासाठी प्रसिध्द असलेल्या खानापूर, आटपाडी, तासगाव, सांगोला व खटाव, माण तालुक्यांतील डाळिंब उत्पादक यावर्षी अवकाळी पावसाने खचून गेला आहे. डाळिंबाची निर्यात करणाऱ्यांना परतीच्या पावसाने अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही, तर निर्यातक्षम डाळिंब बागांना करपा, तेल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. पावसाने पाणी साचून राहिल्याने मुळांची कूज होऊन झाडे पूर्णपणे कोलमडून गेली.काही ठिकाणी उशिरा छाटण्या घेतलेल्या डाळिंब बागांना स्थानिक बाजारपेठेत चालणारी चांगली फळधारणा झाली आहे. परंतु, सध्या ऊन, ढगाळ वातावरण आणि अनेक रोगांचा होणारा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी आता शेडनेट किंवा नॉनओव्हन पेपरचे आवरण घातले आहे.

जिल्'ातील खानापूर, आटपाडी, तासगाव, सोलापूर जिल्'ातील सांगोला, सातारा जिल्'ातील खटाव व माण आदी तालुक्यात शेतक-यांनी डाळिंब बागांतील झाडे व फळे पूर्णपणे झाकून घेतली आहेत. त्यामुळे धुके, दव, उन्हामुळे फळांना पडणारे चट्टे आणि रोगांचा प्रादुर्भाव ब-याच प्रमाणात कमी होणार आहे. डाळिंब फळांना नॉनओव्हन पेपरचे आवरण घातल्यानंतर औषधांचे प्रमाण कमी लागून मोठे कीटक, ऊन, बुरशी आदी रोगांपासून फळांचे संरक्षण होत आहे.गुणवत्ता राखण्यासाठी प्रयोगअवकाळी पावसाने डाळिंब बागांना फटका बसला आहे. सध्या फळधारणा झालेली झाडे वाचविण्यासाठी शेतकºयांनी नॉन ओव्हन पेपर व शेडनेटचा आधार घेतला आहे. अतिपावसाने निर्यात डाळिंब उत्पादन थांबले आहे. त्यामुळे सध्याच्या फळांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी, फळांची गुणवत्ता राखण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत, अशी प्रतिक्रिया येथील डाळिंब उत्पादक व संशोधक दीपक कदम यांनी दिली.अवकाळी पावसाने नेस्तनाबूत झालेला शेतकरी आता हातात येऊ लागलेले डाळिंब वाचविण्यासाठी झाडांना व फळांना नॉनओव्हन पेपरव्दारे आवरण घालत असल्याचे चित्र खानापूर व आटपाडी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी