शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लोकशाहीच्या मजबुतीसाठी शहरी मतदारांनी मतदान टक्का वाढवावा : स्मृती मानधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 10:34 AM

ग्रामीण मतदानापेक्षा शहरी मतदानाचा टक्का कमी आहे. लोकशाही मजबुतीसाठी हे फार चांगले नसून, शहरी मतदारांनी मतदानाच्या हक्काविषयी जागरुक होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान करावे,

सांगली : ग्रामीण मतदानापेक्षा शहरी मतदानाचा टक्का कमी आहे. लोकशाही मजबुतीसाठी हे फार चांगले नसून, शहरी मतदारांनी मतदानाच्या हक्काविषयी जागरुक होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने सांगलीत केले.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सांगलीतील कल्पदु्रम क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात मानधना बोलत होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, उपायुक्त मोसमी बर्डे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते. मतदान जागृतीची ज्योत स्मृती मानधना हिच्याहस्ते प्रज्वलित करून खेळाडूकडे दिली. ही ज्योत जिल्ह्यात सर्वत्र फिरणार असून, दि. २३ एप्रिलला पुन्हा सांगलीत येणार आहे. अभियानानिमित्त सांगलीत रॅलीही काढली. स्मृती मानधना म्हणाली की, क्रिकेटमध्ये प्रत्येक ‘रन’ला महत्त्व असते, त्याचप्रमाणे लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक मताला महत्त्व आहे. यासाठी सर्व मतदारांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याची गरज आहे. आपले एक मत चांगल्या लोकप्रतिनिधीच्या हाती देशाची सूत्रे देऊ शकते. ग्रामीण भागाबरोबर शहरातील मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. 

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, मागील काही निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी लक्षात घेता, शहरी भागातील मतदानाचा टक्का कमी असून, ही बाब चिंतेची आहे. प्रशासन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मतदारांनीही जागरुक राहून  मतदानाचा हक्क बजावावा.

अभिजित राऊत म्हणाले की, प्रशासन गेल्या पंधरा दिवसांपासून मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न केला पाहिजे. जागरुक मतदारांनीही मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी आभार मानले.

टॅग्स :Electionनिवडणूकsangli-pcसांगली