शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यात ४०,००० एकर द्राक्षबागेचा चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:46 IST

सलग तिसऱ्या वर्षी हानी

दत्ता पाटीलतासगाव : गेल्या चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७० टक्के द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ८० हजार एकर क्षेत्रापैकी, ५६ हजार एकरहून अधिक द्राक्षबागांचा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांत घडकूज आणि मणी गळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. मऊ पडू लागलेल्या द्राक्षबागांतील द्राक्षांना तडे गेले आहेत. द्राक्ष बागांच्या नुकसानीचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या नुकसानीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कोलमडून गेला आहे.जिल्ह्यात ८० हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. दोन वर्षांपासून अवकाळीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे टंचाईचे सावट असताना देखील शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने द्राक्षबागा फुलवण्यासाठी जिवाचे रान केले. यावर्षी हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच, गेल्या आठवडाभरातील खराब हवामान आणि अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला.विशेषता तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सप्टेंबरपूर्वी आगाप फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबागेत अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार झालेली असताना देखील, या द्राक्षांचा चिखल झाला आहे.फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागात अवकाळी पावसामुळे घडकूज आणि मणीगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. फुलोरा अवस्थेतील बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. उर्वरित द्राक्षबागादेखील खराब हवामानामुळे डाउनी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.जिल्ह्यातील चाळीस हजार एकरहून अधिक क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला आहे. नुकसानीत सापडलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून द्राक्षबागा पिकवण्यासाठी धडपड करणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकरी सलग तिसऱ्या वर्षी नुकसानीमुळे कर्जाच्या खाईत गेला आहे.

तालुकानिहाय द्राक्षक्षेत्र (हेक्टरमध्ये) -

  • खानापूर : १,१२५
  • क. महांकाळ : २,८७१
  • कडेगाव : २२९
  • पलूस : १,५६१
  • तासगाव : ९.२३६
  • मिरज : ८२६८
  • जत : ६,९०६
  • वाळवा : १,२१५
  • आटपाडी : ३६५
  • - एकूण : ३१,७७६

जिल्ह्यात पाऊस पडलेल्या ठिकाणी द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीचे नजर अंदाज सर्वेक्षण सुरू झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

आठवडाभरापासून हवामान खराब आहे. फुलोरावस्थेतील द्राक्षबागांना सद्य:स्थितीत घडकूज, मणीगळ होऊ नये, यासाठी कोणतेच उपाय नाहीत. छाटणीनंतर पंधरा दिवसांनी गतिरोधक औषधांची फवारणी केली असल्यास नुकसान कमी होऊ शकते. सद्य:स्थितीत शास्त्रज्ञ, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषध फवारणी करावी. जिल्ह्यातील ७० टक्के द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. - सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्षबागायतदार संघ.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस