शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यात ४०,००० एकर द्राक्षबागेचा चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:46 IST

सलग तिसऱ्या वर्षी हानी

दत्ता पाटीलतासगाव : गेल्या चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७० टक्के द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ८० हजार एकर क्षेत्रापैकी, ५६ हजार एकरहून अधिक द्राक्षबागांचा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांत घडकूज आणि मणी गळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. मऊ पडू लागलेल्या द्राक्षबागांतील द्राक्षांना तडे गेले आहेत. द्राक्ष बागांच्या नुकसानीचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या नुकसानीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कोलमडून गेला आहे.जिल्ह्यात ८० हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. दोन वर्षांपासून अवकाळीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे टंचाईचे सावट असताना देखील शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने द्राक्षबागा फुलवण्यासाठी जिवाचे रान केले. यावर्षी हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच, गेल्या आठवडाभरातील खराब हवामान आणि अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला.विशेषता तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सप्टेंबरपूर्वी आगाप फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबागेत अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार झालेली असताना देखील, या द्राक्षांचा चिखल झाला आहे.फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागात अवकाळी पावसामुळे घडकूज आणि मणीगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. फुलोरा अवस्थेतील बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. उर्वरित द्राक्षबागादेखील खराब हवामानामुळे डाउनी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.जिल्ह्यातील चाळीस हजार एकरहून अधिक क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला आहे. नुकसानीत सापडलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून द्राक्षबागा पिकवण्यासाठी धडपड करणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकरी सलग तिसऱ्या वर्षी नुकसानीमुळे कर्जाच्या खाईत गेला आहे.

तालुकानिहाय द्राक्षक्षेत्र (हेक्टरमध्ये) -

  • खानापूर : १,१२५
  • क. महांकाळ : २,८७१
  • कडेगाव : २२९
  • पलूस : १,५६१
  • तासगाव : ९.२३६
  • मिरज : ८२६८
  • जत : ६,९०६
  • वाळवा : १,२१५
  • आटपाडी : ३६५
  • - एकूण : ३१,७७६

जिल्ह्यात पाऊस पडलेल्या ठिकाणी द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीचे नजर अंदाज सर्वेक्षण सुरू झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

आठवडाभरापासून हवामान खराब आहे. फुलोरावस्थेतील द्राक्षबागांना सद्य:स्थितीत घडकूज, मणीगळ होऊ नये, यासाठी कोणतेच उपाय नाहीत. छाटणीनंतर पंधरा दिवसांनी गतिरोधक औषधांची फवारणी केली असल्यास नुकसान कमी होऊ शकते. सद्य:स्थितीत शास्त्रज्ञ, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषध फवारणी करावी. जिल्ह्यातील ७० टक्के द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. - सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्षबागायतदार संघ.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस