मिरज महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशबंदी विद्यापीठाने उठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:00+5:302020-12-13T04:40:00+5:30

ते म्हणाले, ग्रामीण भाग व शहरातील कष्टकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक मागासवर्गीय मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सुरू ...

The university lifted the first year admission ban in Miraj College | मिरज महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशबंदी विद्यापीठाने उठवली

मिरज महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशबंदी विद्यापीठाने उठवली

ते म्हणाले, ग्रामीण भाग व शहरातील कष्टकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक मागासवर्गीय मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सुरू केलेल्या महाविद्यालयाने गेल्या २७ वर्षात लौकिक मिळविला आहे. मात्र महाविद्यालयातील काही कामचुकार शिक्षकांनी गेल्या १० वर्षात महाविद्यालयाच्या कामकाजात अडथळे निर्माण केले आहेत. या शिक्षकांच्या खोट्या तक्रारींमुळे तत्कालीन कुलगुरू देवानंद शिंदे यांनी सुटा शिक्षक संघटनेशी संगनमत करून पदावरुन निवृत्त होण्यापूर्वी एक दिवस अगोदर मिरज महाविद्यालयात प्रथम वर्गाच्या प्रवेशावर बंदी घातली होती.

या निर्णयाविरोधात संस्थेने शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे व व्यवस्थापन परिषद सदस्य अ‍ॅड. धैर्यशील पाटील, संजय जाधव, डॉ. भारती पाटील, अमित कुलकर्णी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यांनी प्रवेशबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रस्ताव राज्यपाल तथा विद्यापीठ कुलपती यांच्याकडे पाठविला असता, त्यांनी कार्यवाहीसाठी विद्यापीठाला सूचना केली. त्यानुसार कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी प्रवेशबंदी आदेश रद्द केल्याने प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The university lifted the first year admission ban in Miraj College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.