शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

उद्धव ठाकरे... सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका वांदा, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंची मिश्किल टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 18:18 IST

आटपाडी (जि. सांगली ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चक्रव्यूहात अडकले असून, त्यांना मी अनेकवेळा त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न ...

आटपाडी (जि. सांगली) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चक्रव्यूहात अडकले असून, त्यांना मी अनेकवेळा त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते बाहेर पडत नसल्याने त्यांना फक्त एक सल्ला दिला आहे की, 'तुम्ही त्या ठिकाणी सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा', अशी मिश्किल टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी केली.

आटपाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी आठवले बोलत होते. त्यांनी कवितेतून भाषणाला सुरुवात करत आटपाडीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, जर विनाकारण हात लावला कोणी माझ्या गाडीला, तर मी आग लावीन त्यांच्या माडीला.

राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीला विरोध दर्शवत ते म्हणाले की, विनाकारण समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करू नका. भोंगे काढण्याची भाषा करू नका. संपूर्ण भारत देश अखंड सर्वधर्मसमभाव जपणारा आहे. भोंगा आवडत नसेल, तर ऐकू नका. संविधानाच्या विरोधात भूमिका योग्य नाही.आठवले म्हणाले, आमचा रिपब्लिकन पक्ष वाद न करणारा व जातीय तेढ निर्माण न करणारा सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र पुढे नेणारा पक्ष आहे. बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना रिपब्लिकन नावाचे वावडे आहे. मी ज्या पक्षासोबत राहतो, त्या पक्षाची सत्ता येते. शिवसेनेने लोकमताचा अनादर करून सत्ता स्थापन केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात माजी महापौर विवेक कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नंदकुमार केंगार, विनोद निकाळजे, सुरेश बारशिंगे, जगन्नाथ ठोकळे, विनोद निकाळजे, अरुण आठवले आदी उपस्थित होते.

शंकरराव खरात स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणारथोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले