शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा: सांगली जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 13:19 IST

रक्कम दिवाळीपूर्वी मिळालीच नाही 

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेंतर्गत विमा उतरविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये विमा कंपन्यांनी मंजूर केले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम वर्ग करण्याचे शासनाने आदेश दिले होते. दिवाळी संपल्यानंतरही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली आहे.खरीप हंगामामध्ये तीन लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरला होता. या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये खरीप पेरणीच न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी देण्यात येणार होती. यासंबंधी राज्य शासनाने विमा कंपनीला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्ह्यांमधील सुमारे ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.पेरणी न झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती. ही रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती, पण शासनाने आदेश देऊनही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई दिली नाही. सांगली जिल्ह्यामध्ये कंपन्यांकडून कोणतेही आक्षेप घेण्यात आले नव्हते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही विमा कंपनीने सांगितले.

भरपाई कशी मिळते?पंतप्रधान पीकविमा योजनेत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास आगाऊ नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये अपेक्षित विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंतची रक्कम आगाऊ दिली जाते. ही नुकसान भरपाई देण्यासाठी एक सूत्र निश्चित करण्यात आलंय.

रब्बीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करापंतप्रधान रब्बी पीकविमा योजनेंतर्गत रब्बी हंगामासाठी एक रुपयामध्ये विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त संख्येन पीकविमा उतरविण्याची गरज आहे, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी व्यक्त केले.

चार दिवसांत भरपाईशेतकऱ्यांना विमा कंपनीची भरपाई केव्हा मिळणार, यासंबंधी कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. यामुळे येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी