शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पीक विमा: सांगली जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 13:19 IST

रक्कम दिवाळीपूर्वी मिळालीच नाही 

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेंतर्गत विमा उतरविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये विमा कंपन्यांनी मंजूर केले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम वर्ग करण्याचे शासनाने आदेश दिले होते. दिवाळी संपल्यानंतरही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली आहे.खरीप हंगामामध्ये तीन लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरला होता. या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये खरीप पेरणीच न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी देण्यात येणार होती. यासंबंधी राज्य शासनाने विमा कंपनीला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्ह्यांमधील सुमारे ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.पेरणी न झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ९८ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती. ही रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती, पण शासनाने आदेश देऊनही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई दिली नाही. सांगली जिल्ह्यामध्ये कंपन्यांकडून कोणतेही आक्षेप घेण्यात आले नव्हते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही विमा कंपनीने सांगितले.

भरपाई कशी मिळते?पंतप्रधान पीकविमा योजनेत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास आगाऊ नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये अपेक्षित विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंतची रक्कम आगाऊ दिली जाते. ही नुकसान भरपाई देण्यासाठी एक सूत्र निश्चित करण्यात आलंय.

रब्बीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करापंतप्रधान रब्बी पीकविमा योजनेंतर्गत रब्बी हंगामासाठी एक रुपयामध्ये विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त संख्येन पीकविमा उतरविण्याची गरज आहे, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी व्यक्त केले.

चार दिवसांत भरपाईशेतकऱ्यांना विमा कंपनीची भरपाई केव्हा मिळणार, यासंबंधी कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. यामुळे येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी