शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

आईच्या संघर्षाला मुलांच्या देदीप्यमान यशाचे कोंदण! तीन मुले डॉक्टर, एक तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:13 IST

संकटे कधी सांगून येत नाहीत; मात्र याच संकटांना शरण जाऊन काम केले तर, इतिहासही घडत नाही. अशीच काहीशी संकटांची मालिका आली असतानाही त्यावर मात करत चारही मुलांना उच्चशिक्षित-उच्चपदस्थ

ठळक मुद्देसंडे अ‍ॅँकर । । कुटुंब स्थिरस्थावर झाल्यानंतर आता विविध सामाजिक उपक्रमांना आधार

शरद जाधव ।सांगली : संकटे कधी सांगून येत नाहीत; मात्र याच संकटांना शरण जाऊन काम केले तर, इतिहासही घडत नाही. अशीच काहीशी संकटांची मालिका आली असतानाही त्यावर मात करत चारही मुलांना उच्चशिक्षित-उच्चपदस्थ बनविण्याचे ध्येय सांगलीतील एका माऊलीने पूर्ण केले आणि त्या म्हणजे इंदुमती भीमसेन जाधव. तीन मुले एमबीबीएस, एम. डी. डॉक्टर, तर एक मुलगी तहसीलदार असे मुलांच्या उच्च पदासाठी व त्याबरोबरच उच्च संस्कारांसाठी त्यांची मेहनत आजही सुरूच असते.

प्रत्येक अडचणींवर मात करून आपल्या कुटुंबाला आकार देणारी असते ती माताच. असाच संघर्षमय प्रवास इंदुमती जाधव यांचा आहे. दरीबडची सासर, तर रांजणी माहेर अशा ग्रामीण भागातून सांगलीत येत त्यांनी कर्तृत्व सिध्द केले आहे. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी शिक्षिका म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळेच इंग्रजीतील व मराठीतील प्रेरणादायी वाक्ये त्यांच्या बोलण्यात सहजपणे येतात.

पती शिक्षक व स्वत:ही नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका. वरवर पाहता एक मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. मात्र, विविध कारणाने वाढलेला कर्जाचा बोजा आणि त्याच्या मानसिक तणावामुळे कुटुंबावर संकटांची मालिकाच सुरू झाली. त्यानंतर पतीच्या निधनाचा धक्का सहन करत त्यांनी चारही मुलांना चांगले शिकविले. त्या सांगतात, अनेक पालक पाल्यांना शिक्षणासाठी चांगल्या शाळेत प्रवेश घेतात. मी स्वत: नगरपालिका शाळेत काम करत असल्याने मुलांनाही नगरपालिकेच्याच शाळेत शिकविले.

केवळ शाळेतच नव्हे, तर पुढे एमबीबीएससारखा अभ्यासक्रमही सर्वांनी गुणवत्तेवर पूर्ण केला. त्यामुळेच त्यांचे पुत्र डॉ. मदन जाधव एमबीबीएसनंतर एम.एस. न्यूरोसर्जन, डॉ. महेश एमबीबीएसनंतर एम.एस. प्लास्टिक अ‍ॅण्ड कॉस्मेटिक सर्जन, कन्या डॉ. नीशाराणी एम. डी. झाल्या, तर कविता जाधव स्पर्धा परीक्षेतून तहसीलदारपदी निवडल्या गेल्या. मुलांनी आईने घेतलेल्या कष्टातून उतराई होण्याचा प्रयत्न केला.आता कुटुंब स्थिरस्थावर झाले असले तरी, सामाजिक बांधिलकीची जपणूक सुरू असते.संकटे शब्दबध्द करून कविता; पुस्तके विकून कुटुंबाला आधारजगण्याचा संघर्ष लढताना आलेल्या संकटाला इंदुमती जाधव यांनी शब्दबध्द करण्यास सुरुवात केली आणि कवितांचे पुस्तकही प्रकाशित केले. एकाचवेळी सर्वांचे शिक्षण सुरू असल्याने पैशाची चणचण भासत होतीच. हार मानतील त्या इंदुमती कसल्या! त्यांनी स्वत: लिहिलेल्या कवितांची पुस्तके विविध ठिकाणी जाऊन विकून पैसा जमविला. ज्या-ज्याठिकाणी शिक्षकांचे उद्बोधन वर्ग असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पुस्तके विकली.

 

टॅग्स :SangliसांगलीjobनोकरीFamilyपरिवार