शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळवून देणार : उद्धव ठाकरे, नेवरी येथे शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 18:37 IST

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना व संभाव्य महाशिवआघाडीचे संकेत मिळत असताना, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. खचून जाऊ नका, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत, शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार आहोत, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळवून देणार : उद्धव ठाकरे नेवरी येथे शेतकऱ्यांशी संवाद

कडेगाव : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना व संभाव्य महाशिवआघाडीचे संकेत मिळत असताना, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. खचून जाऊ नका, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत, शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार आहोत, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.नेवरी (ता. कडेगाव) येथे शुक्रवारी उध्दव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे सूतोवाच केले. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते उपस्थित होते. नेवरी येथील शेतकऱ्यांनी ठाकरे यांच्यासमोर समस्या मांडल्या.यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईबाबत विचारले असता, खचून जाऊ नका, घाबरू नका, मी आपल्याला धीर द्यायलाच आलोय, दिलासा द्यायला आलोय, आपण शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार आहोत. मोठी नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे मदत करावीच लागेल, असे ठाकरे म्हणाले.अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अद्याप कित्येक शेतकºयांचे शेतीपिकांचे पंचनामे झालेले नाहीत. सरकारकडून काहीच मदत मिळालेली नाही. कोणी पाहणी करायलाही आले नाही. पिकाला भाव नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या.

यावर आमदार विश्वजित कदम म्हणाले की, प्रशासनाने चांगले काम केले, परंतु उर्वरित शेतकºयांचे पंचनामे तातडीने करणे गरजेचे आहे. उर्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करा, अशा सूचना ठाकरे यांनी तहसीलदार शैलजा पाटील यांना दिल्या. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSangliसांगली