शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगलीत उद्धवसेनेपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान, पहिल्या फळीतील सर्वच पदाधिकाऱ्यांचा रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:01 IST

सांगली : उद्धवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेसेनेचे शिवबंधन बांधले. त्यामुळे उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पडले ...

सांगली : उद्धवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेसेनेचे शिवबंधन बांधले. त्यामुळे उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पडले आहे. पहिल्या फळीतील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे उद्धवसेनेच्या जिल्ह्यातील अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उद्धवसेना सांभाळणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्यामुळे उर्वरित उद्धवसेना सैरभैर झाली आहे. त्यांना धीर देण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून जिल्ह्यात अनेक पदाधिकारी एकनिष्ठपणे काम करत होते. परंतु, गेल्या काही वर्षात राज्यातील उलथापालथ झाल्यानंतर येथेही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. ‘आयाराम - गयाराम’ जवळपास सर्वच पक्षात पाहायला मिळत आहेत. शिवसेना ही उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात विभागली गेल्यानंतर जिल्ह्यातही तेच चित्र पाहायला मिळाले. येथेही निष्ठावान आणि गद्दारीचे आरोप - प्रत्यारोप झाले. उद्धवसेना आणि शिंदेसेना या दोन्ही सेनेतही पदाधिकारी होते.उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात किल्ला लढवत ठेवला होता. परंतु, नुकतेच शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पाडले. जिल्हाप्रमुख संजय विभुते, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, युवासेनेचे ऋषिकेश पाटील, मिरजेचे प्रा. सिद्धार्थ जाधव, सुनीता मोरे यांच्यासह काही तालुकाप्रमुखांनी उद्धवसेनेची साथ सोडून शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धवसेनेत सध्या पहिल्या फळीतील कोणीही पदाधिकारी शिल्लक राहिले नाहीत.एकाचवेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेना सोडल्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आता दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना जिल्हा सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने एकत्र येऊन कार्यकर्त्यांना धीर दिला. कितीही पदाधिकारी पक्ष सोडून गेले तरी उद्धवसेना जिल्ह्यात कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले. परंतु, ते किती काळ आणि कोणाच्या भरवशावर टिकून राहणार? हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

उद्धवसेनेचा मिरजेत यल्गारसांगली - मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मिरजेत एकत्र येऊन यल्गार पुकारला. ‘उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवसैनिक हा शिवसेनेचा प्राण असल्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे सांगण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर, महादेव मगदूम, तानाजी सातपुते, विष्णू पाटील, सुजाता इंगळे, संजय काटे, चंद्रकांत मैगुरे, महादेव हुलवान, विराज बुटाले, विठ्ठल संकपाळ, किरण पवार, ओंकार देशपांडे, गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना