शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रवासी-मालवाहतूक रिक्षा धडकेत दोघे ठार

By घनशाम नवाथे | Updated: April 25, 2024 20:28 IST

बुधगावात अपघात; मालवाहू रिक्षा चालकाविरूद्ध गुन्हा

घनशाम नवाथे/ सांगली : बुधगाव ते बिसूर ऱस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने धडक दिल्यामुळे अश्विनी शीतल पाटील (वय ३२, रा. सिद्धेश्वर मंदिरजवळ) आणि राघव रमेश पाटील (वय १ वर्षे) ठार झाले. मृत दोघे मामी आणि भाचा आहेत. बुधवारी, दि. २४ रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रिक्षा चालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षा चालक महेश शिवाजी ओंकारे (रा. बिसूर) याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधगावचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वराची यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे पै-पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. बुधवारी रात्री रिक्षा चालक अरविंद पवार याच्या रिक्षा (एमएच १० के ४९५२) मधून शेजारील ललिता ज्ञानदेव पाटील, कावेरी रमेश पाटील, पौर्णिमा शैलेंद्र सावंत, सारिका शेखर पाटील, अश्विनी शीतल पाटील व चार ते पाच लहान मुले जेवण करण्यासाठी बिसूर ते कवलापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते.

रात्री दहाच्या सुमारास जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परत येत होते. तेव्हा बुधगावहून बिसूरकडे तीन चाकी मालवाहतूक रिक्षा (एमएच १० सीक्यू २७६८) येथे होती. परंतू या मालवाहतूक रिक्षाला हेडलाईट नव्हता. या रिक्षाने प्रवासी रिक्षाला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत प्रवासी रिक्षा उलटली. आतील पाच महिला व स्वरा रमेश कोकाटे, समृद्धी शैलेंद्र सावंत, जयदीप शेखर पाटील, अवधूत शैलेंद्र सावंत, राघव पाटील ही मुले जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू दुर्दैवाने अश्विनी पाटील आणि राघव पाटील हे दोघेजण मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बुधगाव-बिसूरवर शोककळा

मृत अश्विनी हिचा वर्षापूर्वी विवाह झाला होता. तर चिमुकल्या राघवच्या जावळाचा कार्यक्रम नुकतेच झाला होता. बुधगावला सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कुटुंबिय एकत्र आले होते. अपघातामध्ये मामी आणि चिमुकल्या भाच्याचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही गावात शोककळा पसरली आहे.

रिक्षात चालकासह ११ जण-ज्या प्रवासी रिक्षाचा अपघात झाला, त्यामध्ये पाच महिला आणि पाच मुले असे चालकासह ११ जण बसले होते. अपघातानंतर काही बाहेर फेकले गेले तर काही आत अडकले. अपघातानंतर अंधारात गोंधळ उडाला होता

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूSangliसांगली