शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Sangli Accident: मदतीला गेला अन् जीव गमावला; अथणीजवळ दोन अपघातात तिघेजण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:32 IST

मृत दोघे शिरोळचे, एकजण कवलापूरचा

अथणी : कर्नाटकातील कागवाड-विजापूर राज्य मार्गावर मुरगुंडी गावाजवळ बनजवाड पीयू कॉलेजजवळ गुरुवारी मध्यरात्री जोरदार पावसात चिरा घेऊन जाणारा ट्रक आणि उसाचे बियाणे भरून जाणारी पिकअप यांच्यात धडक होऊन दोघेजण ठार झाले.अपघातानंतर बचाव करण्यास गेलेल्या एकास मोटारीने ठोकरल्याने तो देखील ठार झाला. शुभम युवराज चव्हाण (वय २४, रा. कुटवाड, ता. शिरोळ), महेश सुभाष गाताडे (वय ३०, रा. गणेशवाडी, ता. शिरोळ) आणि सचिन विलास माळी (वय ४२, रा. कवलापूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी येथे चिरा भरलेला ट्रक (केए २८ एए ५३८१) हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास विजापूरकडे निघाला होता. त्याचवेळी अथणी येथून उसाची रोपे भरलेली पिकअप जीप (एमएच १० सीआर ९८७७) कागवाडकडे जात होती. भरपूर पाऊस सुरू असल्यामुळे समाेरील वाहने दिसण्यास अडथळा येत होता.चिरा भरलेल्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. चौदा चाकांच्या अवजड ट्रकने पिकअपला धडक दिल्यानंतर दोन्ही वाहने उलटली. यामध्ये पिकअपमधील शुभम चव्हाण आणि महेश गाताडे हे दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.यावेळी मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सचिन माळी हे चौघांना घेऊन कुणाळा (ता. अथणी) येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी मोटार (एमएच ११ वाय ६०५०) मधून जात होते. वाटेत अपघात झाल्याचे पाहून मदतकार्यासाठी माळी खाली उतरले. त्याचवेळी अथणीहून कागवाडकडे जाणारी मोटार (केए २२ एमसी ९२५१) ने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोटार अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर माळी यांचे नातेवाईक मोटारीतून गडबडीत खाली उतरताना अंधारात खाली पडून किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर अथणीचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उपार आणि पोलिस पथक घटनास्थळी धावले. पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे रस्त्यावर नियंत्रण ठेवून पंचनामा करताना कसरत करावी लागली. यावेळी रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मदतीला गेला अन् जीव गमावलाकागवाड-विजापूर रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी म्हणून सचिन माळी (रा. कवलापूर) हे मोटारीतून खाली उतरले. परंतु त्याचवेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिल्यामुळे ते ठार झाले. माळी यांचा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच कवलापूर येथे शोककळा पसरली होती.