शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कवलापुरात सिद्धेश्वर यात्रेत दोन गटात हाणामारी--खानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 15:32 IST

कवलापूर (ता. मिरज) येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत

ठळक मुद्देखानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपार

सांगली : कवलापूर (ता. मिरज)       येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत. मिरवणुकीने देवास  नैवेद्य घेऊन जाताना दुचाकीचा हॉर्न वाजविल्यावरून शुक्रवारी ही घटना घडली. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता.

जखमींमध्ये सागर गणेश कांबळे (वय २९), दशरथ पोपट कांबळे   (२२), सौरभ मुरलीधर कांबळे (२१), शिवाजी भीमराव खाडे (३०), राकेश सनातन कांबळे (२१), ऋतुराज मोहिते (१९), दादासाहेब अशोक कांबळे (३१), किरण केशव यादव (२४), सूरज प्रकाश माळी (२३, सर्व रा. कवलापूर) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोघांचा हात मोडला आहे, तर अन्य सर्वजणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सायंकाळी जखमींपैकी सात जणांची मिरज शासकीय रुग्णालयात सीटीस्कॅन तपासणी करण्यात आली. दोन्ही गटाच्या समर्थकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे, हवालदार संतोष माने यांच्या पथकाने कवलापूरला भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयात जखमींचे जबाब नोंदवून घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.शुक्रवारपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ झाला. पहिल्यादिवशी बैलगाडी सजवून मिरवणुकीने देवास नैवेद्य नेण्याची परंपरा आहे.

सकाळी आठपासून गावात प्रत्येक समाजाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. सिद्धेश्वर गल्लीमध्ये एक मिरवणूक थांबली होती. तेवढ्यात तेथून दुचाकीवरून दोन तरुण निघाले होते. मिरवणुकीतील बैलगाड्यांमुळे त्यांना पुढे जाता येत नव्हते. हॉर्न वाजवित त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एका बैलगाडीचा बैल उधळल्याने त्यांना या बैलाचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकीवरील तरुणांना राग आला. त्यांनी गाडीवानास, ‘बैलाचा दोरखंड व्यवस्थित ओढून धरता येत नाही का’ असा जाब विचारला. यातून त्यांच्यात भांडण झाले. काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा वाद तिथेच मिटविला होता. त्यानंतर काही वेळानंतर हे दुचाकीस्वार तरुण ५०     ते ६० जणांचा जमाव घेऊन      सिद्धेश्वर गल्लीत आले. त्यांच्या हातात काठ्या, कुºहाड व तलवारी होत्या. त्यांनी त्या बैलगाडीवानास शोधून मारहाण सुरू केली. दोन्ही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यात जोरदार मारामारी झाली.

 

खानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपारविटा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी, खानापूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील १३ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यात विटा शहरातील १२ जणांचा समावेश असून वरूण विकास सावंत (रा. विटा) यास सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. सांगली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून निवडणुकीच्या कालावधित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी विटा ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सौ. अश्विनी जिरंगे यांच्याकडे प्रस्ताव पाठविले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संदीप तानाजी अडसुळे (रा. अडसरवाडी-पोसेवाडी, ता. खानापूर) यास सांगली जिल्ह्यातून एक महिन्याकरिता हद्दपार केले आहे. तसेच वरूण विकास सावंंत (रा. विटा) यास सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर सागर बबन सोनवणे, धनाजी अण्णा साठे, नितीन दादा कांबळे, लखन रामचंद्र ठोंबरे, नितीन पांडुरंग जाधव, प्रवीण सदाशिव डुबल, साजिद आमानुला आगा, दिलीप अशोक शिंदे, नितीन लक्ष्मण माने, विकास लक्ष्मण शिंगाडे व सचिन शिवाजी मेटकरी (सर्व रा. विटा) या ११ जणांना दि. १४ ते २५ एप्रिल २०१९ पर्यंत खानापूर तालुक्यातून हद्दपार केले आहे. या ११ जणांना या कालावधित प्रवेश व राहण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली