शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

कवलापुरात सिद्धेश्वर यात्रेत दोन गटात हाणामारी--खानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 15:32 IST

कवलापूर (ता. मिरज) येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत

ठळक मुद्देखानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपार

सांगली : कवलापूर (ता. मिरज)       येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत. मिरवणुकीने देवास  नैवेद्य घेऊन जाताना दुचाकीचा हॉर्न वाजविल्यावरून शुक्रवारी ही घटना घडली. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता.

जखमींमध्ये सागर गणेश कांबळे (वय २९), दशरथ पोपट कांबळे   (२२), सौरभ मुरलीधर कांबळे (२१), शिवाजी भीमराव खाडे (३०), राकेश सनातन कांबळे (२१), ऋतुराज मोहिते (१९), दादासाहेब अशोक कांबळे (३१), किरण केशव यादव (२४), सूरज प्रकाश माळी (२३, सर्व रा. कवलापूर) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोघांचा हात मोडला आहे, तर अन्य सर्वजणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सायंकाळी जखमींपैकी सात जणांची मिरज शासकीय रुग्णालयात सीटीस्कॅन तपासणी करण्यात आली. दोन्ही गटाच्या समर्थकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे, हवालदार संतोष माने यांच्या पथकाने कवलापूरला भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयात जखमींचे जबाब नोंदवून घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.शुक्रवारपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ झाला. पहिल्यादिवशी बैलगाडी सजवून मिरवणुकीने देवास नैवेद्य नेण्याची परंपरा आहे.

सकाळी आठपासून गावात प्रत्येक समाजाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. सिद्धेश्वर गल्लीमध्ये एक मिरवणूक थांबली होती. तेवढ्यात तेथून दुचाकीवरून दोन तरुण निघाले होते. मिरवणुकीतील बैलगाड्यांमुळे त्यांना पुढे जाता येत नव्हते. हॉर्न वाजवित त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एका बैलगाडीचा बैल उधळल्याने त्यांना या बैलाचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकीवरील तरुणांना राग आला. त्यांनी गाडीवानास, ‘बैलाचा दोरखंड व्यवस्थित ओढून धरता येत नाही का’ असा जाब विचारला. यातून त्यांच्यात भांडण झाले. काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा वाद तिथेच मिटविला होता. त्यानंतर काही वेळानंतर हे दुचाकीस्वार तरुण ५०     ते ६० जणांचा जमाव घेऊन      सिद्धेश्वर गल्लीत आले. त्यांच्या हातात काठ्या, कुºहाड व तलवारी होत्या. त्यांनी त्या बैलगाडीवानास शोधून मारहाण सुरू केली. दोन्ही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यात जोरदार मारामारी झाली.

 

खानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपारविटा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी, खानापूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील १३ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यात विटा शहरातील १२ जणांचा समावेश असून वरूण विकास सावंत (रा. विटा) यास सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. सांगली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून निवडणुकीच्या कालावधित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी विटा ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सौ. अश्विनी जिरंगे यांच्याकडे प्रस्ताव पाठविले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संदीप तानाजी अडसुळे (रा. अडसरवाडी-पोसेवाडी, ता. खानापूर) यास सांगली जिल्ह्यातून एक महिन्याकरिता हद्दपार केले आहे. तसेच वरूण विकास सावंंत (रा. विटा) यास सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर सागर बबन सोनवणे, धनाजी अण्णा साठे, नितीन दादा कांबळे, लखन रामचंद्र ठोंबरे, नितीन पांडुरंग जाधव, प्रवीण सदाशिव डुबल, साजिद आमानुला आगा, दिलीप अशोक शिंदे, नितीन लक्ष्मण माने, विकास लक्ष्मण शिंगाडे व सचिन शिवाजी मेटकरी (सर्व रा. विटा) या ११ जणांना दि. १४ ते २५ एप्रिल २०१९ पर्यंत खानापूर तालुक्यातून हद्दपार केले आहे. या ११ जणांना या कालावधित प्रवेश व राहण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली