शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

तलावात कृषीपंप सोडताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, सांगलीतील आटपाडीत घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:17 IST

जेवणानंतर अनिकेतसोबत फिरायला म्हणून शेताकडे गेले आणि दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला

आटपाडी : येथील तलावातून पाणी उपशासाठी कृषीपंप सोडण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २०) दुपारी तीन वाजता ही घटना घडली. अनिकेत अमृत विभूते (वय २७, रा. माडगुळे, ता. आटपाडी) आणि त्याच्या मावशीचे पती विलास मारुती गुळदगड (४७, रा. शेवते, ता. पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.आटपाडी शहराच्या पश्चिमेकडील तलावामध्ये हा प्रकार घडला. विभूतेची माडगुळे येथे शेती आहे. त्यासाठी आटपाडी तलावातून १२ किलोमीटरची पाइपलाइन करून पाणी नेले आहे. तराफ्याद्वारे विद्युतपंप पाण्यात सोडला आहे. गुरुवारी दुपारी अनिकेत व त्याच्या मावशीचे पती विलास दोघेही तलावाकडे गेले होते. तलावातील पाणीपातळी खालावल्याने पंप बाहेर आल्याचे दिसले. तो आणखी खाली सोडण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले. यावेळी वायर शॉर्ट होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. त्यामुळे दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तलावाजवळच्या काही लोकांनी ही घटना पाहिली.काही अंतरावर असलेल्या तडवळेचे सरपंच जितेंद्र गिड्डे, दादासाहेब मरगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वीजप्रवाह बंद करून दोघांनाही तलावातून बाहेर काढले. आटपाडी ग्रामीण रुग्णालयात नेले, पण उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच माडगुळे येथील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

सकाळीच माडगुळेला आले अन्...अनिकेत विभूते अविवाहित होता. विलास गुळदगड गुरुवारीच शेवते येथून माडगुळेला आले होते. दुपारी जेवणानंतर अनिकेतसोबत फिरायला म्हणून शेताकडे गेले आणि दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला. दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजDeathमृत्यू