शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sangli: पाडळीवाडी ओढ्याच्या पुरात दोघे दुचाकीस्वार वाहून गेले, प्रसंगावधानामुळे बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 18:04 IST

शिरसी : शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडीदरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून ...

शिरसी : शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडीदरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून झाडास पकडून राहिल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे दाेघेही बचावले. शनिवारी रात्री ही घटना घडली.तालुक्याच्या उत्तर भागात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता दमदार पाऊस झाला. निगडी-पाडळीवाडीदरम्यान असलेल्या ओढ्याला अचानक पाणी वाढले. दरम्यान, पाडळीवाडीचे बाबासाहेब काशीनाथ पाटील (वय ४५) व मारुती दादू पाटील (वय ४६) कामानिमित्त निगडी येथे आले होते. पावसाचा जोर वाढल्याने, त्यांना गावातच थांबावे लागले. रात्री दहा वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने दोघे दुचाकीवरून पाडळीवाडीस परतत हाेते. यावेळी ओढ्याचे पाणी पुलावरून जात होते. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दाेघेही क्षणात दुचाकीसह ओढ्यात वाहून गेले. बाबासाहेब पाटील यांना पोहता येत होते. तीनशे फूट वाहत गेल्यावर झाडाच्या फांदीचा आधार घेत ते कसेबसे पाण्याबाहेर पडले. शेतातून वाट शोधत ते ओढ्यापासून शंभर फुटावर सुनंदा साळुंखे यांच्या घरात आले. साळुंखे कुटुंबास आपला मित्र पाण्यात वाहून गेल्याचे सांगून गावातील लाेकांना मदतीसाठी बाेलावण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सुनंदा साळुंखे, त्यांचा मुलगा अनिकेत यांनी गावातील लोकांसह व पशुवैद्यक डॉ. दीपक पाटील यांना घटनेची माहिती दिली.अंधारात बॅटरीच्या उजेड पाडत मारुती पाटील यांचा शोध सुरू केला. घटनास्थळापासून पाचशे फूट अंतरावर ते झाडाला पकडून थांबल्याचे दिसून आले. तरुणांनी पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढले. रविवारी सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकीही सापडली.

साळुंखे कुटुंबाचे प्रसंगावधानशनिवारी रात्री पुलावरून पाणी जात हाेतेे. पाण्याचा मोठा प्रवाह आहे, हे लक्षात आल्यानंतर जवळच राहत असलेल्या साळुंखे कुटुंबीयांनी रस्त्यावर बैलगाडी आडवी लावली. मोठा पाऊस असतानाही सुनंदा साळुंखे यांनी घरासमोर उभे राहून, दूध गाड्यांसह अनेक चारचाकी व दुचाकी वाहने परत पाठवली. त्यामुळे माेठी दुर्घटना टळली.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेfloodपूर