शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

कोयना धरणाच्या अडीच पट पाणी कर्नाटकात गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 13:18 IST

Flood KoynaDam Sangli : सांगलीत महापुराच्या तीन दिवसांत कृष्णेतून ३८ टीएमसी पाणी वाहून गेले. जून आणि जुलै या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोयना धरणाच्या अडीच पटींहून अधिक तर अलमट्टीच्या सव्वादोन पट पाणी वाहून गेल्याचे निरिक्षण पाटबंधारे विभागाने नोंदविले आहे.

ठळक मुद्देकोयना धरणाच्या अडीच पट पाणी कर्नाटकात गेले वाहून२०१९ मध्ये गेले ३३० टीएमसी

संतोष भिसेसांगली : सांगलीत महापुराच्या तीन दिवसांत कृष्णेतून ३८ टीएमसी पाणी वाहून गेले. जून आणि जुलै या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोयना धरणाच्या अडीच पटींहून अधिक तर अलमट्टीच्या सव्वादोन पट पाणी वाहून गेल्याचे निरिक्षण पाटबंधारे विभागाने नोंदविले आहे.सांगलीतील महापुराची रौद्रता स्पष्ट करणारी ही आकडेवारी आहे. २१ जुलैपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा धुमाकूळ सुरु झाला. २३ जुलैरोजी ५० हजार क्युसेक विसर्ग सुरु झाला. सांगलीत कृष्णेची ३९ फुटांवरील पाणीपातळी वेगाने वाढली.

२४ ते २६ जुलै या महापूरकाळात आयर्विन पुलापासून ३८ टीएमसी पाणी गेले. चांदोलीच्या क्षमतेपेक्षा साडेतीन टीएमसी जास्त पाणी गेल्याचे पाटबंधारेचे निरिक्षण आहे. १ जून ते २९ जुलै या दोन महिन्यांत कृष्णा, कोयना, पंचगंगा दुथडी भरुन वाहत होत्या. या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले.सांगलीत २१ ते २९ जुलै या महापूरकाळात आयर्विन पुलापासून ७४ टीएमसी पाणी पुढे गेले. या काळात राजापूर धरणातून १२७ टीएमसी पाणी कर्नाटकात गेले. कोयना धरणातून यावेळी सरासरी ३३ ते ४९ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात होते.२०१९ मध्ये गेले ३३० टीएमसी२०१९ च्या महापुरावेळी २५ जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान ३३० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले होते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता २१२ टीएमसी आहे, त्याच्या दीडपटीहून अधिक पाणी कर्नाटकात गेले होते. यावर्षी ११८ टीएमसी जास्त वाहून गेले.दुष्काळी भागात पुरवठा अशक्यपावसाळ्यात कर्नाटकात वाहून जाणारे पाणी जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला देण्याचा उपाय सातत्याने सुचवला जातो, पण महापुराचे पाणी पूर्णत: उचलण्याइतपत सिंचन योजना सक्षम नाहीत हे लक्षात घेतले जात नाही. म्हैसाळ सिंचन योजना सलग तीन महिने सुरु ठेवली तरी फक्त ७ टीएमसी पाण्याचा उपसा शक्य होतो.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणfloodपूरSangliसांगलीKarnatakकर्नाटकWaterपाणी