शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणाच्या अडीच पट पाणी कर्नाटकात गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 13:18 IST

Flood KoynaDam Sangli : सांगलीत महापुराच्या तीन दिवसांत कृष्णेतून ३८ टीएमसी पाणी वाहून गेले. जून आणि जुलै या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोयना धरणाच्या अडीच पटींहून अधिक तर अलमट्टीच्या सव्वादोन पट पाणी वाहून गेल्याचे निरिक्षण पाटबंधारे विभागाने नोंदविले आहे.

ठळक मुद्देकोयना धरणाच्या अडीच पट पाणी कर्नाटकात गेले वाहून२०१९ मध्ये गेले ३३० टीएमसी

संतोष भिसेसांगली : सांगलीत महापुराच्या तीन दिवसांत कृष्णेतून ३८ टीएमसी पाणी वाहून गेले. जून आणि जुलै या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोयना धरणाच्या अडीच पटींहून अधिक तर अलमट्टीच्या सव्वादोन पट पाणी वाहून गेल्याचे निरिक्षण पाटबंधारे विभागाने नोंदविले आहे.सांगलीतील महापुराची रौद्रता स्पष्ट करणारी ही आकडेवारी आहे. २१ जुलैपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा धुमाकूळ सुरु झाला. २३ जुलैरोजी ५० हजार क्युसेक विसर्ग सुरु झाला. सांगलीत कृष्णेची ३९ फुटांवरील पाणीपातळी वेगाने वाढली.

२४ ते २६ जुलै या महापूरकाळात आयर्विन पुलापासून ३८ टीएमसी पाणी गेले. चांदोलीच्या क्षमतेपेक्षा साडेतीन टीएमसी जास्त पाणी गेल्याचे पाटबंधारेचे निरिक्षण आहे. १ जून ते २९ जुलै या दोन महिन्यांत कृष्णा, कोयना, पंचगंगा दुथडी भरुन वाहत होत्या. या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले.सांगलीत २१ ते २९ जुलै या महापूरकाळात आयर्विन पुलापासून ७४ टीएमसी पाणी पुढे गेले. या काळात राजापूर धरणातून १२७ टीएमसी पाणी कर्नाटकात गेले. कोयना धरणातून यावेळी सरासरी ३३ ते ४९ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात होते.२०१९ मध्ये गेले ३३० टीएमसी२०१९ च्या महापुरावेळी २५ जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान ३३० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले होते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता २१२ टीएमसी आहे, त्याच्या दीडपटीहून अधिक पाणी कर्नाटकात गेले होते. यावर्षी ११८ टीएमसी जास्त वाहून गेले.दुष्काळी भागात पुरवठा अशक्यपावसाळ्यात कर्नाटकात वाहून जाणारे पाणी जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला देण्याचा उपाय सातत्याने सुचवला जातो, पण महापुराचे पाणी पूर्णत: उचलण्याइतपत सिंचन योजना सक्षम नाहीत हे लक्षात घेतले जात नाही. म्हैसाळ सिंचन योजना सलग तीन महिने सुरु ठेवली तरी फक्त ७ टीएमसी पाण्याचा उपसा शक्य होतो.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणfloodपूरSangliसांगलीKarnatakकर्नाटकWaterपाणी