शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दिलासादायक! जिल्ह्यात २८ दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 15:30 IST

सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५०८३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४८४९ गृहविलगीकरणात आहेत. तर दवाखान्यात आणि कोविड केअर सेंटरमध्ये केवळ २३४ रुग्णांचा समावेश

सांगली : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने सुरू असून, तब्बल २८ दिवसांनंतर सांगली जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गुरुवारी १९४२ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये एकूण ३८२ रुग्ण आढळले, तर प्रकृती ठणठणीत होऊन ८४२ जण घरी परतले, ही बाब दिलासादायक असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५०८३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४८४९ गृहविलगीकरणात आहेत. तर दवाखान्यात आणि कोविड केअर सेंटरमध्ये केवळ २३४ रुग्णांचा समावेश आहे.

मिरज शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत ३४९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. १५९३ व्यक्तींची अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ३२६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन्ही मिळून १९४२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३८२ नवे रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १९.६७ टक्के आहे. दरम्यान, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी १०३ रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. १७ रुग्ण मध्यम लक्षणाची, परंतु ऑक्सिजनवर आहेत, तर ७५ रुग्ण मध्यम लक्षणाची, परंतु विनाऑक्सिजनवर आहेत, तर ४८४९ जणांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. हे सर्व रुग्ण होम आयसोलेशनमधील आहेत. उर्वरित २३४ रुग्ण रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याचा मृत्यू दर ०.२२ टक्के

सद्य:स्थितीत सांगली जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर ०.२२ टक्क्यांवर आहे. २०२० मध्ये कोरोनाचा मृत्यूदर ३.६४ टक्के तर २०२१ मध्ये २.४१ टक्के मृत्यूदर होता. जानेवारी २०२२ मध्ये मृत्यूदर घटला आहे, हे जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे, अशी माहिती जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असून, मृत्यूच्या सत्रालाही ब्रेक लागला आहे. कोरोना पॉझिटिव्ह ९५ टक्के रुग्ण घरातच बरे होत आहेत. असे असले, तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. बेफिकिरी बाळगून कोरोनाला निमंत्रण देऊ नका. कोरोनाचे नियम पाळा. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने लस घ्यावी. -जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या