शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानातील थडगी काढून केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:35 IST

आष्टा येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्मशानातील थडगी काढून केले वृक्षारोपणवीरशैव लिंगायत समाजाचा क्रांतिकारी निर्णय

सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.आष्टा शहरात वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजातील मान्यवरांनी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शहरातील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात सर्वांनी सहकार्य केले आहे. प्

रकाश महाजन यांनी आष्टा शहरातील श्री चौंडेश्वरी देवीच्या वज्रलेप विधीपासून विविध धार्मिक कार्यात सहभाग घेऊन प्रवचनाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक, सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला आहे. शहराचा लौकिक वाढविला आहे.वीरशैव लिंगायत समाजाची आष्टा-मर्दवाडी रस्त्यावर सुमारे दोन एकर जागेत स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत काटेरी झुडपे, झाडे उगवल्यामुळे अंत्यविधीवेळी अडचणी निर्माण होत असत. याबाबत समाजाने बैठक घेऊन, लोकवर्गणी गोळा करून वेळोवेळी स्मशानभूमीची स्वच्छता केली. २००० मध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कूपनलिका खोदण्यात आली. तसेच स्मशानभूमीला दगडी कुंपण बांधण्यात आले.समाज पुढे जात असतानाच या सुसंस्कृत समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश महाजन, विजय कावरे, अनिल महाजन, भालचंद्र कावरे, सुनील सांभारे, श्रीकांत कोरे, सतीश महाजन, केतन महाजन, विवेक महाजन यांच्यासह सर्व समाजबांधव एकत्र आले व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. विवेक महाजन व सहकारी यांनी स्मशानभूमी विकासाचा आराखडा तयार केला.

समाजातील सर्वांना एकत्र करून, या ठिकाणी असलेली पूर्वजांची स्मारके म्हणजेच थडगी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेकांना हा निर्णय रुचला नाही. मात्र सर्वांनी सुमारे पाच लाखाच्या दरम्यान मदत केली. परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतल्याने समाजाने या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला.स्मशानभूमीतील दोन एकर जागा स्वच्छ करून सुसज्ज रस्ता करण्यात आला. नांगरट करून जमीन सपाट करण्यात आली. समाजातील सर्व युवकांनी अहोरात्र मेहनत करून चिंच व शतावरीची रोपे लावली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा फूलझाडांसह वड, पिंपळ, उंबर, लिंब, चाफा यासह विविध प्रकारची झाडे लावली.यावेळी श्री ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, डॉ. एन. डी. सांगले, दौलत थोटे, संजय लोखंडे, महेश गुरव, संतोष जोशी, डॉ. निशिकांत महाजन, निखिल खुडे, पोपट माळी, केरू शिंदे, सत्तू ढोले उपस्थित होते. या झाडांना ठिबक सिंचनच्या माध्यमातून नियमितपणे पाणी देऊन या उपक्रमात सातत्य कायम ठेवले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगली