शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

स्मशानातील थडगी काढून केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:35 IST

आष्टा येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्मशानातील थडगी काढून केले वृक्षारोपणवीरशैव लिंगायत समाजाचा क्रांतिकारी निर्णय

सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.आष्टा शहरात वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजातील मान्यवरांनी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शहरातील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात सर्वांनी सहकार्य केले आहे. प्

रकाश महाजन यांनी आष्टा शहरातील श्री चौंडेश्वरी देवीच्या वज्रलेप विधीपासून विविध धार्मिक कार्यात सहभाग घेऊन प्रवचनाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक, सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला आहे. शहराचा लौकिक वाढविला आहे.वीरशैव लिंगायत समाजाची आष्टा-मर्दवाडी रस्त्यावर सुमारे दोन एकर जागेत स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत काटेरी झुडपे, झाडे उगवल्यामुळे अंत्यविधीवेळी अडचणी निर्माण होत असत. याबाबत समाजाने बैठक घेऊन, लोकवर्गणी गोळा करून वेळोवेळी स्मशानभूमीची स्वच्छता केली. २००० मध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कूपनलिका खोदण्यात आली. तसेच स्मशानभूमीला दगडी कुंपण बांधण्यात आले.समाज पुढे जात असतानाच या सुसंस्कृत समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश महाजन, विजय कावरे, अनिल महाजन, भालचंद्र कावरे, सुनील सांभारे, श्रीकांत कोरे, सतीश महाजन, केतन महाजन, विवेक महाजन यांच्यासह सर्व समाजबांधव एकत्र आले व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. विवेक महाजन व सहकारी यांनी स्मशानभूमी विकासाचा आराखडा तयार केला.

समाजातील सर्वांना एकत्र करून, या ठिकाणी असलेली पूर्वजांची स्मारके म्हणजेच थडगी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेकांना हा निर्णय रुचला नाही. मात्र सर्वांनी सुमारे पाच लाखाच्या दरम्यान मदत केली. परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतल्याने समाजाने या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला.स्मशानभूमीतील दोन एकर जागा स्वच्छ करून सुसज्ज रस्ता करण्यात आला. नांगरट करून जमीन सपाट करण्यात आली. समाजातील सर्व युवकांनी अहोरात्र मेहनत करून चिंच व शतावरीची रोपे लावली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा फूलझाडांसह वड, पिंपळ, उंबर, लिंब, चाफा यासह विविध प्रकारची झाडे लावली.यावेळी श्री ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, डॉ. एन. डी. सांगले, दौलत थोटे, संजय लोखंडे, महेश गुरव, संतोष जोशी, डॉ. निशिकांत महाजन, निखिल खुडे, पोपट माळी, केरू शिंदे, सत्तू ढोले उपस्थित होते. या झाडांना ठिबक सिंचनच्या माध्यमातून नियमितपणे पाणी देऊन या उपक्रमात सातत्य कायम ठेवले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगली