शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

स्मशानातील थडगी काढून केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:35 IST

आष्टा येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्मशानातील थडगी काढून केले वृक्षारोपणवीरशैव लिंगायत समाजाचा क्रांतिकारी निर्णय

सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.आष्टा शहरात वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजातील मान्यवरांनी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शहरातील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात सर्वांनी सहकार्य केले आहे. प्

रकाश महाजन यांनी आष्टा शहरातील श्री चौंडेश्वरी देवीच्या वज्रलेप विधीपासून विविध धार्मिक कार्यात सहभाग घेऊन प्रवचनाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक, सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला आहे. शहराचा लौकिक वाढविला आहे.वीरशैव लिंगायत समाजाची आष्टा-मर्दवाडी रस्त्यावर सुमारे दोन एकर जागेत स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत काटेरी झुडपे, झाडे उगवल्यामुळे अंत्यविधीवेळी अडचणी निर्माण होत असत. याबाबत समाजाने बैठक घेऊन, लोकवर्गणी गोळा करून वेळोवेळी स्मशानभूमीची स्वच्छता केली. २००० मध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कूपनलिका खोदण्यात आली. तसेच स्मशानभूमीला दगडी कुंपण बांधण्यात आले.समाज पुढे जात असतानाच या सुसंस्कृत समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश महाजन, विजय कावरे, अनिल महाजन, भालचंद्र कावरे, सुनील सांभारे, श्रीकांत कोरे, सतीश महाजन, केतन महाजन, विवेक महाजन यांच्यासह सर्व समाजबांधव एकत्र आले व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. विवेक महाजन व सहकारी यांनी स्मशानभूमी विकासाचा आराखडा तयार केला.

समाजातील सर्वांना एकत्र करून, या ठिकाणी असलेली पूर्वजांची स्मारके म्हणजेच थडगी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेकांना हा निर्णय रुचला नाही. मात्र सर्वांनी सुमारे पाच लाखाच्या दरम्यान मदत केली. परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतल्याने समाजाने या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला.स्मशानभूमीतील दोन एकर जागा स्वच्छ करून सुसज्ज रस्ता करण्यात आला. नांगरट करून जमीन सपाट करण्यात आली. समाजातील सर्व युवकांनी अहोरात्र मेहनत करून चिंच व शतावरीची रोपे लावली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा फूलझाडांसह वड, पिंपळ, उंबर, लिंब, चाफा यासह विविध प्रकारची झाडे लावली.यावेळी श्री ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, डॉ. एन. डी. सांगले, दौलत थोटे, संजय लोखंडे, महेश गुरव, संतोष जोशी, डॉ. निशिकांत महाजन, निखिल खुडे, पोपट माळी, केरू शिंदे, सत्तू ढोले उपस्थित होते. या झाडांना ठिबक सिंचनच्या माध्यमातून नियमितपणे पाणी देऊन या उपक्रमात सातत्य कायम ठेवले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगली