शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:22 IST

एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली

सदानंद औंधेमिरज (जि. सांगली) : मध्य रेल्वेने गेल्या तीन वर्षांत पार्सल बोगीतून तब्बल १५४० मृतदेहांची वाहतूक केली. त्यासाठी सुमारे ४ कोटी ६२ लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. मुंबई विभागात सर्वाधिक १४८७ मृतदेहांची वाहतूक झाली आहे. मृतदेहासाठी मालवाहतुकीची बोगी रिकामी ठेवावी लागत असल्याने हे नुकसान झाले आहे.देशभरात हजारो किलोमीटर लांब अंतरावर मृतदेह वाहून नेण्यासाठी लांब पल्ल्याची रेल्वे सोयीची ठरते. मुंबईतून बिहार, आसाम, दक्षिण भारत, दिल्ली यासह परराज्यात दूरच्या ठिकाणी रस्त्याने मृतदेह नेणे फारच महाग व वेळखाऊ आहे. अशा वेळी रेल्वे वाहतूक अत्यंत सोयीची, कमी खर्चिक व सुरक्षित ठरते. त्यासाठी मेल, एक्स्प्रेस गाडीच्या पार्सल बोगीचा वापर होतो. गाडीच्या पहिल्या किंवा शेवटच्या पार्सल बोगीत मृतदेह ठेवला जातो.एक्स्प्रेसमध्ये प्रत्येकी चार टन क्षमतेच्या दोन पार्सल बोगी असतात. मृतदेह ठेवलेल्या बोगीत अन्य कोणतेही साहित्य भरले जात नाही. त्यासाठी ३० हजारांच्या महसुलावर पाणी सोडावे लागते. इतके नुकसान सोसल्यानंतरही सामाजिक बांधीलकी म्हणून मृतदेहाची वाहतूक केली जाते. संबंधित मृताचा अंतिम प्रवास त्याच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी पार्थिव त्याच्या प्रदेशात पोहोचवले जाते.मृतदेह वाहतुकीचे शुल्कही अत्यल्प ठेवण्यात आले आहे. मुंबईतून उत्तर व दक्षिण भारतात लांब पल्ल्यावर मृतदेह नेण्यासाठी फक्त एक ते दीड हजार रुपये आकारण्यात येतात. कोरोना काळात २०२० पासूनच्या गेल्या तीन वर्षांत १५४० मृतदेहांची वाहतूक झाली. त्यासाठी तितक्याच बोगी फक्त मृतदेहासह म्हणजे रिकाम्याच धावल्या. त्यामुळे ४ कोटी ६२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.

तीन वर्षांतील विभागनिहाय मृतदेह वाहतूक

  • मुंबई १,४८७
  • भुसावळ ४७
  • नागपूर २
  • पुणे ४
  • एकूण १,५४० 

मुंबईतून परप्रांतीय मजुरांच्या मृतदेहांची वाहतूकमुंबईत परप्रांतीय मजुरांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे तेथून सर्वाधिक मृतदेहांची वाहतूक होते. तीन वर्षांत एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली आहे. सोलापूर विभागात एकाही मृतदेहाची वाहतूक झालेली नाही.

बर्फाच्या पेटीतून वाहतूकरेल्वेतून मृतदेह वाहतुकीसाठी नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते बर्फाच्या पेटीत ठेवूनच रेल्वेकडे सोपवावे लागते. रेल्वेकडे विनंती केल्यानंतर एका दिवसात पार्सल बोगी उपलब्ध करून देण्यात येते.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे