शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:22 IST

एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली

सदानंद औंधेमिरज (जि. सांगली) : मध्य रेल्वेने गेल्या तीन वर्षांत पार्सल बोगीतून तब्बल १५४० मृतदेहांची वाहतूक केली. त्यासाठी सुमारे ४ कोटी ६२ लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. मुंबई विभागात सर्वाधिक १४८७ मृतदेहांची वाहतूक झाली आहे. मृतदेहासाठी मालवाहतुकीची बोगी रिकामी ठेवावी लागत असल्याने हे नुकसान झाले आहे.देशभरात हजारो किलोमीटर लांब अंतरावर मृतदेह वाहून नेण्यासाठी लांब पल्ल्याची रेल्वे सोयीची ठरते. मुंबईतून बिहार, आसाम, दक्षिण भारत, दिल्ली यासह परराज्यात दूरच्या ठिकाणी रस्त्याने मृतदेह नेणे फारच महाग व वेळखाऊ आहे. अशा वेळी रेल्वे वाहतूक अत्यंत सोयीची, कमी खर्चिक व सुरक्षित ठरते. त्यासाठी मेल, एक्स्प्रेस गाडीच्या पार्सल बोगीचा वापर होतो. गाडीच्या पहिल्या किंवा शेवटच्या पार्सल बोगीत मृतदेह ठेवला जातो.एक्स्प्रेसमध्ये प्रत्येकी चार टन क्षमतेच्या दोन पार्सल बोगी असतात. मृतदेह ठेवलेल्या बोगीत अन्य कोणतेही साहित्य भरले जात नाही. त्यासाठी ३० हजारांच्या महसुलावर पाणी सोडावे लागते. इतके नुकसान सोसल्यानंतरही सामाजिक बांधीलकी म्हणून मृतदेहाची वाहतूक केली जाते. संबंधित मृताचा अंतिम प्रवास त्याच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी पार्थिव त्याच्या प्रदेशात पोहोचवले जाते.मृतदेह वाहतुकीचे शुल्कही अत्यल्प ठेवण्यात आले आहे. मुंबईतून उत्तर व दक्षिण भारतात लांब पल्ल्यावर मृतदेह नेण्यासाठी फक्त एक ते दीड हजार रुपये आकारण्यात येतात. कोरोना काळात २०२० पासूनच्या गेल्या तीन वर्षांत १५४० मृतदेहांची वाहतूक झाली. त्यासाठी तितक्याच बोगी फक्त मृतदेहासह म्हणजे रिकाम्याच धावल्या. त्यामुळे ४ कोटी ६२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.

तीन वर्षांतील विभागनिहाय मृतदेह वाहतूक

  • मुंबई १,४८७
  • भुसावळ ४७
  • नागपूर २
  • पुणे ४
  • एकूण १,५४० 

मुंबईतून परप्रांतीय मजुरांच्या मृतदेहांची वाहतूकमुंबईत परप्रांतीय मजुरांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे तेथून सर्वाधिक मृतदेहांची वाहतूक होते. तीन वर्षांत एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली आहे. सोलापूर विभागात एकाही मृतदेहाची वाहतूक झालेली नाही.

बर्फाच्या पेटीतून वाहतूकरेल्वेतून मृतदेह वाहतुकीसाठी नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते बर्फाच्या पेटीत ठेवूनच रेल्वेकडे सोपवावे लागते. रेल्वेकडे विनंती केल्यानंतर एका दिवसात पार्सल बोगी उपलब्ध करून देण्यात येते.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे