शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड

By admin | Updated: October 28, 2016 23:50 IST

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक : जिल्ह्यात ६०६ उमेदवारांचे अर्ज दाखल; आज अंतिम मुदत; आॅफलाईन अर्ज स्वीकारणार

सांगली : जिल्ह्यात होत असलेल्या पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकीची चुरस वाढत असून, शुक्रवारी अनेकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला. जिल्ह्यात दिवसभरात ३७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, शुक्रवारअखेर ६०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज, शनिवार शेवटचा दिवस आहे. त्यातच आॅफलाईन अर्ज भरण्याची सवलत मिळाल्याने आज एकच गर्दी उसळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख शहरांत निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात आष्टा, इस्लामपूर, तासगाव, विटा आणि पलूस या नगरपालिका, तर कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, शिराळा येथील नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आज, शनिवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व असल्याने शुक्रवारी अनेक उमेदवारांनी हाच मुहूर्त साधला. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अर्ज दाखल करताना चुरस दिसून आली. विटा येथे दिवसभरात ५४ अर्ज, तर तासगाव येथे ६० अर्ज दाखल झाले. या निवडणुकीसाठी आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने, प्रशासनावरील ताण बऱ्यापैकी कमी झाला असला तरी, उमेदवार आणि पक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. आॅनलाईनच्या फटक्यामुळे खानापूर येथे केवळ पाच उमेदवारी अर्ज शुक्रवारअखेर दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने नगरपरिषद निवडणुकीतील चुरस वाढली आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून, या प्रक्रियेबाबत संभ्रम दिसत होता. परंतु निवडणूक आयोगाने उमेदवारांची अडचण लक्षात घेऊन शुक्रवारी आॅफलाईन अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली. शिवाय शनिवारी अंतिम मुदत असल्याने गर्दी उसळणार आहे. (प्रतिनिधी) शिराळ््यात बहिष्कार कायम ४पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा करण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी शिराळकर नागरिकांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. ४उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस उरला असताना एकही अर्ज दाखल झाला नसल्याने नागरिकांचा बहिष्कार कायम राहण्याची शक्यता आहे. आज सुटी तरीही... ४आज, शनिवारी नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आज स्थानिक सुटी जाहीर केली आहे. ४या सुटीदिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याविषयी शंका असतानाच, सुटी असली तरीही आज, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.