शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मेघगर्जनेसह पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपले; डाळिंब, द्राक्षाचे मोठे नुकसान

By अशोक डोंबाळे | Updated: June 12, 2025 19:35 IST

आज मुसळधार पावसाचा अंदाज : सांगली, मिरज शहरात सर्वत्र पाणीच पाणी

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्याला हवामान विभागाने दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर गुरुवारी दमदार पावसाला सुरुवात झाली. सकाळी जोरदार पावसानंतर दुपारपर्यंत उघडीप दिली होती. मात्र दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाने झोडपून काढले. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, तासगाव तालुक्यातील मुसळधार पाऊस झाला. सांगली, मिरज शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले होते. दरम्यान, शुक्रवारी, दि. १३ मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्याला चार दिवस पावसाने उघडीप दिली होती. परंतु दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला होता. गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. काही वेळ पावसाच्या सरी बसरल्यानंतर सकाळी १० वाजल्यानंतर पावसाने उघडीप घेतली. मात्र उष्म्यात वाढ झाली होती.दुपारी तीननंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी मोठ्या असल्याने काही वेळातच पाणीच पाणी झाले. वाळवा तालुक्यातील आष्टा, बावची, बागणी, तांदूळवाडी, बहादूरवाडी, बोरगाव, नेर्ले भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर राहिला. तेथील बहुतांशी गावात पाऊस सुरूच राहिला. मिरज तालुक्यातील तुुंग, कसबेडिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, मौजे डिग्रज, नांद्रे परिसरात जोराच्या पावसाने हजेरी लावली. तासगाव शहरासह मांजर्डे, विसापूर, पेड, वायफळे, बलगवडे, बस्तवडे, मणेराजुरी, कवठेएकंद, कुमठे आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला.

शहरात जनजीवन विस्कळीतसांगली शहरात दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी सुरू झालेल्या जोराच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. काँग्रेस कमिटी, मारुती रोड, भाजी मंडई, स्टँड परिसर, मार्केट यार्ड परिसर, स्टेशन चौक, सिटी पोस्ट चौकांत पाणी साचले होते, मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती.

डाळिंब, द्राक्षाचे मोठे नुकसानगेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून राहिले आहे. पाऊस उघडीप घेत नसल्यामुळे द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने द्राक्ष, डाळिंबासह अन्य फळपिकांच्या नुकसानीत मोठी वाढ होणार आहे.

चोवीस तासांत ५ मि.मी. पाऊसजिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मिरज २.०९ मिलिमीटर, जत २.८, खानापूर ४.१, वाळवा ५.६, तासगाव ६.३, शिराळा ७.६, आटपाडी ३.५, कवठेमहांकाळ ४.४, पलूस ४.५ आणि कडेगाव तालुक्यात ८.२ मि.मी पाऊस झाला.