शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मेघगर्जनेसह पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपले; डाळिंब, द्राक्षाचे मोठे नुकसान

By अशोक डोंबाळे | Updated: June 12, 2025 19:35 IST

आज मुसळधार पावसाचा अंदाज : सांगली, मिरज शहरात सर्वत्र पाणीच पाणी

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्याला हवामान विभागाने दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर गुरुवारी दमदार पावसाला सुरुवात झाली. सकाळी जोरदार पावसानंतर दुपारपर्यंत उघडीप दिली होती. मात्र दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाने झोडपून काढले. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, तासगाव तालुक्यातील मुसळधार पाऊस झाला. सांगली, मिरज शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले होते. दरम्यान, शुक्रवारी, दि. १३ मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्याला चार दिवस पावसाने उघडीप दिली होती. परंतु दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला होता. गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. काही वेळ पावसाच्या सरी बसरल्यानंतर सकाळी १० वाजल्यानंतर पावसाने उघडीप घेतली. मात्र उष्म्यात वाढ झाली होती.दुपारी तीननंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी मोठ्या असल्याने काही वेळातच पाणीच पाणी झाले. वाळवा तालुक्यातील आष्टा, बावची, बागणी, तांदूळवाडी, बहादूरवाडी, बोरगाव, नेर्ले भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर राहिला. तेथील बहुतांशी गावात पाऊस सुरूच राहिला. मिरज तालुक्यातील तुुंग, कसबेडिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, मौजे डिग्रज, नांद्रे परिसरात जोराच्या पावसाने हजेरी लावली. तासगाव शहरासह मांजर्डे, विसापूर, पेड, वायफळे, बलगवडे, बस्तवडे, मणेराजुरी, कवठेएकंद, कुमठे आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला.

शहरात जनजीवन विस्कळीतसांगली शहरात दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी सुरू झालेल्या जोराच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. काँग्रेस कमिटी, मारुती रोड, भाजी मंडई, स्टँड परिसर, मार्केट यार्ड परिसर, स्टेशन चौक, सिटी पोस्ट चौकांत पाणी साचले होते, मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती.

डाळिंब, द्राक्षाचे मोठे नुकसानगेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून राहिले आहे. पाऊस उघडीप घेत नसल्यामुळे द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने द्राक्ष, डाळिंबासह अन्य फळपिकांच्या नुकसानीत मोठी वाढ होणार आहे.

चोवीस तासांत ५ मि.मी. पाऊसजिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मिरज २.०९ मिलिमीटर, जत २.८, खानापूर ४.१, वाळवा ५.६, तासगाव ६.३, शिराळा ७.६, आटपाडी ३.५, कवठेमहांकाळ ४.४, पलूस ४.५ आणि कडेगाव तालुक्यात ८.२ मि.मी पाऊस झाला.