शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती

By अशोक डोंबाळे | Updated: July 17, 2025 19:17 IST

पीक विम्यास फार्मर आयडीचा अडथळा : वीस हजार शेतकऱ्यांनीच उतरविला विमा; उरले केवळ १५ दिवस

अशोक डोंबाळेसांगली : निसर्गाचा असमतोल, अवकाळी पाऊस, दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा काढून संरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत असून, १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सहा लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ८८१ शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी फक्त १५ दिवस उरले आहेत. मात्र, यंदा पीक विमा भरण्यासाठी शासनाने फार्मर आयडीसह ई-पीक पाहणी अनिवार्य केली आहे. यामुळे खरीप हंगामातील साडेतीन लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात एकूण खातेदारांची सहा लाख संख्या असून, खरीप हंगामातील शेतकरी संख्या चार लाखापर्यंत आहे. २०२४च्या खरीप हंगामामध्ये ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. चालू खरीप हंगामामध्ये १५ जुलै २०२५पर्यंत केवळ १९ हजार ८८१ शेतकऱ्यांनी १० हजार १९ हेक्टरचा पीक विमा उतरविला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे १८ लाख २६ हजार ४८६.४८ रुपये विमा कंपनीकडे भरले आहेत.नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना पीक विमा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा भरण्यासाठी ३१ जुलैची मुदत आहे. आता केवळ १५ दिवस शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यासाठी कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत साडेतीन लाख शेतकरी पीक विमा उतरविणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने फार्मर आयडीसह अनेक अटी लादल्यामुळे पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे.

पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची संख्यातालुका - शेतकरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • आटपाडी - ९४६ ५३४.१५
  • जत - १३५०९ / ७४१२.०१
  • कडेगाव - २१९ / ६३.३७
  • क.महांकाळ - ९८० / ४१५.०४
  • खानापूर - ८९९ / ३४२.४३
  • मिरज - ४०३ / २२१.९८
  • पलूस - १३८ / ६८.७६
  • शिराळा - १५४ / ३६.१९
  • तासगाव - २३५६ / ८२५.५३
  • वाळवा - २७७ / १००.३४

नैसर्गिक आणि बाजारातील दराचा असमतोल या दोन्ही कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना शासनाने १०० टक्के मोफत पीक विमा देण्याची गरज होती. पण, त्याकडे शासनाने दुर्लक्ष करून पैसे भरण्याची सक्ती केली आहे. तसेच फार्मर आयडीही अनेक शेतकऱ्यांकडे नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी पीक विमा उतरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष, सांगली