शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती

By अशोक डोंबाळे | Updated: July 17, 2025 19:17 IST

पीक विम्यास फार्मर आयडीचा अडथळा : वीस हजार शेतकऱ्यांनीच उतरविला विमा; उरले केवळ १५ दिवस

अशोक डोंबाळेसांगली : निसर्गाचा असमतोल, अवकाळी पाऊस, दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा काढून संरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत असून, १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सहा लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ८८१ शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी फक्त १५ दिवस उरले आहेत. मात्र, यंदा पीक विमा भरण्यासाठी शासनाने फार्मर आयडीसह ई-पीक पाहणी अनिवार्य केली आहे. यामुळे खरीप हंगामातील साडेतीन लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात एकूण खातेदारांची सहा लाख संख्या असून, खरीप हंगामातील शेतकरी संख्या चार लाखापर्यंत आहे. २०२४च्या खरीप हंगामामध्ये ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. चालू खरीप हंगामामध्ये १५ जुलै २०२५पर्यंत केवळ १९ हजार ८८१ शेतकऱ्यांनी १० हजार १९ हेक्टरचा पीक विमा उतरविला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे १८ लाख २६ हजार ४८६.४८ रुपये विमा कंपनीकडे भरले आहेत.नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना पीक विमा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा भरण्यासाठी ३१ जुलैची मुदत आहे. आता केवळ १५ दिवस शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यासाठी कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत साडेतीन लाख शेतकरी पीक विमा उतरविणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने फार्मर आयडीसह अनेक अटी लादल्यामुळे पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे.

पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची संख्यातालुका - शेतकरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • आटपाडी - ९४६ ५३४.१५
  • जत - १३५०९ / ७४१२.०१
  • कडेगाव - २१९ / ६३.३७
  • क.महांकाळ - ९८० / ४१५.०४
  • खानापूर - ८९९ / ३४२.४३
  • मिरज - ४०३ / २२१.९८
  • पलूस - १३८ / ६८.७६
  • शिराळा - १५४ / ३६.१९
  • तासगाव - २३५६ / ८२५.५३
  • वाळवा - २७७ / १००.३४

नैसर्गिक आणि बाजारातील दराचा असमतोल या दोन्ही कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना शासनाने १०० टक्के मोफत पीक विमा देण्याची गरज होती. पण, त्याकडे शासनाने दुर्लक्ष करून पैसे भरण्याची सक्ती केली आहे. तसेच फार्मर आयडीही अनेक शेतकऱ्यांकडे नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी पीक विमा उतरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष, सांगली