शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

मागणी नसल्यामुळे साडेबारा हजार किलो बियाणे कंपन्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:12 IST

सांगली जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील पेरणीसाठी ४७ हजार ३७२ क्विंटल बियाणे आणि एक लाख २५ हजार ७१० टन खताची मागणी केली होती. जवळपास दीड लाख हेक्टवर पेरणीच झाली नसल्यामुळे कृषी दुकानदारांनी बारा हजार ४५६ किलो बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले आहे. तसेच जिल्ह्यात एक लाख टन रासायनिक खत मागणी नसल्यामुळे शिल्लक आहे.

ठळक मुद्देसाडेबारा हजार किलो बियाणे कंपन्यांना परतमागणी नसल्यामुळे जिल्ह्यात एक लाख टन रासायनिक खत शिल्लक

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील पेरणीसाठी ४७ हजार ३७२ क्विंटल बियाणे आणि एक लाख २५ हजार ७१० टन खताची मागणी केली होती. जवळपास दीड लाख हेक्टवर पेरणीच झाली नसल्यामुळे कृषी दुकानदारांनी बारा हजार ४५६ किलो बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले आहे. तसेच जिल्ह्यात एक लाख टन रासायनिक खत मागणी नसल्यामुळे शिल्लक आहे.जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्र आहे. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयाबीनचे १७ हजार १४८ क्विंटल, ज्वारी सहा हजार ८७ क्विंटल, बाजरी एक हजार ६५२ क्विंटल, तूर ५१९ क्विंटल, तर मका पाच हजार ३२६ क्विंटल अशा एकूण ४८ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली होती. त्यानुसार बियाणांचा पुरवाठाही झाला. पण, कृषी दुकानदारांनी मागणीच नसल्यामुळे बारा हजार ४५६ क्विंटल बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले.

सध्या जिल्ह्यात एक हजार ८०२ क्विंटल बियाणे कृषी दुकानदारांकडे शिल्लक आहे. दुकानदारांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दुष्काळामुळे बियाणे विक्री थंडावली असल्याचे सांगितले.

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एक लाख सहा हजार ४७२ मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे केली आहे. त्यात युरिया २० हजार ९४५ टन, डीएपी १७ हजार ८०९ टन, एमओपी २० हजार ३६५ टन, एसएसपी १९ हजार १७२ टन, एनपीके २८ हजार १८१ टन, तर मिश्रखते ५ हजार टन अशी मागणी केली होती. यापैकी एक लाख आठ हजार ६०८ टन खताचा पुरवठा झाला आहे.

या रासायनिक खतालाही जिल्ह्यात फारशी मागणी नाही. वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज पश्चिम भागामध्येच रासायनिक खताचा पुरवठा होत आहे. उर्वरित पाच दुष्काळी तालुक्यातून मागणी नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली