शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

विचारवंत म्हणाले, साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:21 PM

सांगली : समाजातील दु:खी, पीडितांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांच्या दु:खात मनोरंजन शोधणाऱ्या प्रवृत्तींचा अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग असतो. नयनतारा ...

सांगली : समाजातील दु:खी, पीडितांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांच्या दु:खात मनोरंजन शोधणाऱ्या प्रवृत्तींचा अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग असतो. नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटनापासून दूर ठेवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाºयांचा केवळ निषेध न करता, कष्टकºयांच्या करातून जमा झालेला पैसा साहित्य संमेलनाला देऊ नये, अशी ठाम भूमिका मान्यवरांनी रविवारी व्यक्त केली.अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करून, नंतर निमंत्रण मागे घेण्याच्या निर्णयाच्या निषेधासाठी रविवारी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत बैठक घेतली. यावेळी सहगल यांच्या संमेलनात होणाºया भाषणाचे सामूहिक वाचन करण्यात आले.ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावून नंतर निमंत्रण रद्द करण्याच्या साहित्य संमेलन आयोजकांच्या निर्णयाने सर्वजण अस्वस्थ आहेत. कलावंत, लेखक, विचारवंतांचे वर्तन हे समाजासाठी प्रेरणा देणारे असावे. त्यांच्या साहित्यातून मानवतेची मूल्ये मांडली गेली पाहिजेत. मात्र, असे होताना दिसत नाही. त्यामुळे दृष्टी व्यापक करत विद्रोही साहित्याचे प्रमाण वाढले पाहिजे. खरा स्वातंत्र्यलढा उभारण्याची आता वेळ आली आहे. महामंडळाने शब्दवेल्हाळ गुलामांची फौज तयार केली आहे.धनाजी गुरव म्हणाले, सहगल यांचे विचार पुरोगामी आहेत हे माहीत असतानाही, त्यांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलाविण्यात आले. समाजवादी व स्वत:ला क्रांतिकारी विचारांचे समजणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वळचणीला गेले आहेत. यातील अनेक लेखक स्वत:ला पुरोगामी म्हणवत असले तरी, त्यांच्या विचारातून ते दिसत नाही. या निर्णयाचा निषेध करायला हवा.अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, पुरस्कारांसाठी लिहिणाºया संमेलनाशी बांधील रहावे लागते. आता सावधपणे भूमिका आवश्यक आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्दचे कृत्य हे अनवधानाने नव्हे, तर ठरवून झालेले कृत्य आहे. केवळ निषेध न करता साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान बंद करण्यासाठी पाठपुरावा करावा.यावेळी नामदेव करगणे, वि. द. बर्वे, गौतमीपुत्र कांबळे, विकास मगदूम, बी. जी. पाटील, योगेश पाटील, सदाशिव मगदूम, शाहिन शेख, विद्या स्वामी, दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.बुधवारी सांगलीत पुस्तिकेचे प्रकाशनजिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांच्या पुढाकाराने बुधवार, दि. २३ रोजी स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी नयनतारा सहगल यांचे साहित्य संमेलनातील भाषण व इतर क्रांतिकारी विचारांची मांडणी असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्याचा निर्णय घेण्यात आला.