शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सांगलीत काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन गट नाराज, पक्षीय कार्यापासून दूर

By अविनाश कोळी | Updated: February 17, 2025 17:06 IST

लोकसभेला बांधकाम, विधानसभेला पडझड

अविनाश कोळीसांगली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लागलेले बंडखोरीचे खंडग्रास ग्रहण आता फुटीच्या खग्रास ग्रहणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेले दोन्ही गट सध्या पक्षीय कार्यापासून दूर वेगळ्या वाटेने जाण्याच्या विचारात दिसत आहेत. पक्षीय स्तरावर याबाबत कोणतीही पावले न उचलल्यास मोठा फटका जिल्ह्यातील काँग्रेसला बसणार आहे.सांगली विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. ही बंडखोरी रोखण्यात ना स्थानिक नेत्यांना यश आले ना राज्यस्तरावरील नेत्यांना. निवडणुकीत या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला. त्यानंतर मतदारसंघातील काँग्रेसचे राजकारण थंडावले.जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व निवडणुकीतील अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यात अत्यंत टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले. सोशल मीडियावरील पोस्टवरून पोलिसांत तक्रारी व गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे लोकसभेला एकसंध असणारे हे दोन्ही गट टोकाच्या संघर्षाने विभागले गेले. राजकारण केवळ गटबाजीपुरते उरले नाही, तर पक्षफुटीपर्यंत टोकाला गेले अहे.

वादळापूर्वीची शांतताजयश्रीताई पाटील यांनी पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. मात्र, वेगळा विचार करण्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाच्या चर्चाही सुरू आहेत. सध्या जयश्रीताई पाटील व त्यांच्या विरोधातील पृथ्वीराज पाटील यांचा गट शांत असला तरी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप नेत्यांशी मैत्रभावपृथ्वीराज पाटील यांच्या भेटीला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आले होते. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार करण्यात आला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व पृथ्वीराज पाटील एकत्र आले होते. त्यांचा हा मैत्रभावही पक्षप्रवेशाच्या चर्चांना बळ देत आहे.

कार्यकर्ते संभ्रमावस्थेतसांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्र, तसेच सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात या दोन्ही गटांची ताकद आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मात्र, दोन्ही नेत्यांच्या शांत भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

लोकसभेला बांधकाम, विधानसभेला पडझडकाँग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस एकसंध केली होती. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या काँग्रेस नेत्याला असे यश मिळाले होते. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला. मात्र, काँग्रेस एकजुटीच्या या गडाची पडझड लगेच विधानसभा निवडणुकीत झाली. आता पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण