शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन गट नाराज, पक्षीय कार्यापासून दूर

By अविनाश कोळी | Updated: February 17, 2025 17:06 IST

लोकसभेला बांधकाम, विधानसभेला पडझड

अविनाश कोळीसांगली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लागलेले बंडखोरीचे खंडग्रास ग्रहण आता फुटीच्या खग्रास ग्रहणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेले दोन्ही गट सध्या पक्षीय कार्यापासून दूर वेगळ्या वाटेने जाण्याच्या विचारात दिसत आहेत. पक्षीय स्तरावर याबाबत कोणतीही पावले न उचलल्यास मोठा फटका जिल्ह्यातील काँग्रेसला बसणार आहे.सांगली विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. ही बंडखोरी रोखण्यात ना स्थानिक नेत्यांना यश आले ना राज्यस्तरावरील नेत्यांना. निवडणुकीत या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला. त्यानंतर मतदारसंघातील काँग्रेसचे राजकारण थंडावले.जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व निवडणुकीतील अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यात अत्यंत टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले. सोशल मीडियावरील पोस्टवरून पोलिसांत तक्रारी व गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे लोकसभेला एकसंध असणारे हे दोन्ही गट टोकाच्या संघर्षाने विभागले गेले. राजकारण केवळ गटबाजीपुरते उरले नाही, तर पक्षफुटीपर्यंत टोकाला गेले अहे.

वादळापूर्वीची शांतताजयश्रीताई पाटील यांनी पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. मात्र, वेगळा विचार करण्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाच्या चर्चाही सुरू आहेत. सध्या जयश्रीताई पाटील व त्यांच्या विरोधातील पृथ्वीराज पाटील यांचा गट शांत असला तरी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप नेत्यांशी मैत्रभावपृथ्वीराज पाटील यांच्या भेटीला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आले होते. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार करण्यात आला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व पृथ्वीराज पाटील एकत्र आले होते. त्यांचा हा मैत्रभावही पक्षप्रवेशाच्या चर्चांना बळ देत आहे.

कार्यकर्ते संभ्रमावस्थेतसांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्र, तसेच सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात या दोन्ही गटांची ताकद आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मात्र, दोन्ही नेत्यांच्या शांत भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

लोकसभेला बांधकाम, विधानसभेला पडझडकाँग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस एकसंध केली होती. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या काँग्रेस नेत्याला असे यश मिळाले होते. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला. मात्र, काँग्रेस एकजुटीच्या या गडाची पडझड लगेच विधानसभा निवडणुकीत झाली. आता पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण