शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:38 IST

दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली.

समडोळी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने केली. यात काही प्रमाणात यश आले असले तरी निश्चित ऊसदर, हमीभाव, एफआरपी रक्कम, थकीत बिले, पहिली उचल व काटमारीसह अन्य समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, साखर कारखानदारांवर संघटितपणे दबाव आणणे अपरिहार्य बनले आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.समडोळी (ता. मिरज) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सुभाष मगदूम, माणिक खोत, कासीम मुजावर, पायगोडा ढोले, प्रा. बी. एस चव्हाण, संदीप आडमुठे, पोपटराव मोरे प्रमुख उपस्थित होते.शेट्टी म्हणाले की, गतवर्षी राज्यात १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन निघाले. यातही दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली. याबाबत साखर कारखानदारांना जाब विचारावा लागेल. यामुळे संघटनेच्या पाठीशी राहूनच आपण आपला न्याय हक्क पदरात पाडून घ्यावा.युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आम्ही आजवर ताकद देण्याचे काम केले आहे. नेते मंडळींनीदेखील आम्हाला वाऱ्यावर सोडू नये असे मत मांडले.महेश खराडे म्हणाले, ऊस दरामध्ये खोडा घालण्याचे काम राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्यांनी केले आहे. शेतकरी हितापेक्षा सुडाचे राजकारण हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीतही कारखान्यास चांगला दर देण्यास आम्ही भाग पडू.यावेळी पोपटराव मोरे, प्रा. बी. एस. चव्हाण, प्रफुल्ल मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. महावीर बिरनाळे यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार