शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:38 IST

दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली.

समडोळी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने केली. यात काही प्रमाणात यश आले असले तरी निश्चित ऊसदर, हमीभाव, एफआरपी रक्कम, थकीत बिले, पहिली उचल व काटमारीसह अन्य समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, साखर कारखानदारांवर संघटितपणे दबाव आणणे अपरिहार्य बनले आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.समडोळी (ता. मिरज) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सुभाष मगदूम, माणिक खोत, कासीम मुजावर, पायगोडा ढोले, प्रा. बी. एस चव्हाण, संदीप आडमुठे, पोपटराव मोरे प्रमुख उपस्थित होते.शेट्टी म्हणाले की, गतवर्षी राज्यात १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन निघाले. यातही दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली. याबाबत साखर कारखानदारांना जाब विचारावा लागेल. यामुळे संघटनेच्या पाठीशी राहूनच आपण आपला न्याय हक्क पदरात पाडून घ्यावा.युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आम्ही आजवर ताकद देण्याचे काम केले आहे. नेते मंडळींनीदेखील आम्हाला वाऱ्यावर सोडू नये असे मत मांडले.महेश खराडे म्हणाले, ऊस दरामध्ये खोडा घालण्याचे काम राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्यांनी केले आहे. शेतकरी हितापेक्षा सुडाचे राजकारण हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीतही कारखान्यास चांगला दर देण्यास आम्ही भाग पडू.यावेळी पोपटराव मोरे, प्रा. बी. एस. चव्हाण, प्रफुल्ल मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. महावीर बिरनाळे यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार