शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:38 IST

दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली.

समडोळी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने केली. यात काही प्रमाणात यश आले असले तरी निश्चित ऊसदर, हमीभाव, एफआरपी रक्कम, थकीत बिले, पहिली उचल व काटमारीसह अन्य समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, साखर कारखानदारांवर संघटितपणे दबाव आणणे अपरिहार्य बनले आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.समडोळी (ता. मिरज) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सुभाष मगदूम, माणिक खोत, कासीम मुजावर, पायगोडा ढोले, प्रा. बी. एस चव्हाण, संदीप आडमुठे, पोपटराव मोरे प्रमुख उपस्थित होते.शेट्टी म्हणाले की, गतवर्षी राज्यात १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन निघाले. यातही दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली. याबाबत साखर कारखानदारांना जाब विचारावा लागेल. यामुळे संघटनेच्या पाठीशी राहूनच आपण आपला न्याय हक्क पदरात पाडून घ्यावा.युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आम्ही आजवर ताकद देण्याचे काम केले आहे. नेते मंडळींनीदेखील आम्हाला वाऱ्यावर सोडू नये असे मत मांडले.महेश खराडे म्हणाले, ऊस दरामध्ये खोडा घालण्याचे काम राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्यांनी केले आहे. शेतकरी हितापेक्षा सुडाचे राजकारण हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीतही कारखान्यास चांगला दर देण्यास आम्ही भाग पडू.यावेळी पोपटराव मोरे, प्रा. बी. एस. चव्हाण, प्रफुल्ल मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. महावीर बिरनाळे यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार