शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी, चंद्रहार पाटील यांची मागणी; आझाद मैदानात उपोषणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 20:20 IST

वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे कुस्ती विश्वात संभ्रमाचे वातावरण

विटा : राज्यातील सर्वोच्च मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत आता वाद निर्माण झाला आहे. १९६० पासून एकमेव सर्वोच्च स्पर्धा म्हणून महाराष्ट्र केसरी स्वीकारली जात होती. मात्र, आता संघटनेमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे कुस्ती विश्वात संभ्रमाचे वातावरण असून, कुस्तीगिरांची हेळसांड होत आहे. या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शासनाकडे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, अशी मागणी केली असून, तोडगा न निघाल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी किताबासाठी अनेक स्पर्धा झाल्यामुळे खरा महाराष्ट्र केसरी कोण हेच लोकांना उमगत नाही. त्यामुळे या किताबाची प्रतिष्ठा व किंमत कमी होत आहे. गेल्या वर्षी निवडणुकीमुळे २०२४ मधील स्पर्धा पुढे ढकलल्या. परिणामी २०२५ मध्ये दोन स्पर्धा झाल्या. यंदा नोव्हेंबरमध्ये पुन्हा दोन स्पर्धा होणार आहेत. आणखी एका संघटनेचाही उदय झाल्याचे समजते. अशा परिस्थितीत एका वर्षात पाच महाराष्ट्र केसरी तयार होत असून, हा प्रकार राज्यातील कुस्ती परंपरेला धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे शासनाने या स्थितीवर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.आंदोलनाचा पावित्राचंद्रहार पाटील यांनी यापूर्वी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले होते, तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मागणी केली होती. मात्र, अजून कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी आता निर्णायक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आमचा कोणत्याही कुस्तीगीर संघटनेला विरोध नाही. मात्र, दरवर्षी फक्त एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, हीच आमची एकमेव मागणी आहे. - पै. चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी, विटा