शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

"गडखिंडीत रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याच्या ऐतिहासिक घटनेचे शेणोलीजवळ स्मारक व्हावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 13:22 IST

७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.

कडेगाव : स्वातंत्र्यलढ्यावेळी सशस्त्र लढ्यासाठी लागणारा पैसा उभारण्यास येडेमच्छिंद्र- शेणोली दरम्यानच्या गडखिंडीत  रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याची इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अशा घटना आजच्या समस्यांशी झगडण्याची प्रेरणा देतात. या शौर्यशाली इतिहासाची नव्या पिढीला ओळख व्हावी, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानीच्या स्मरण व्हावे म्हणून शेणोलीजवळ रेल्वे लुटीच्या घटनेचे स्मारक व्हावे असे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.कुंडल तालुका पलूस येथे प्रतिसरकारच्या तुफान दलाचे झुंझार कॅप्टन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर कॅप्टन रामचंद्र लाड यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न झाला. यावेळी  कॅप्टन रामचंद्र लाड जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या हस्ते रोख ५० हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असलेला पुरस्कार साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार अरुण लाड,  जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, व्याख्याते अविनाश भारती, बाळासाहेब पवार, गौरव नायकवडी,लेखिका कॉ.नमिता वायकर उपस्थित होते.यावेळी बोलताना अशोक ढवळे म्हणाले, कुंडल म्हणजे स्वातंत्र्याच्या धगधगत्या क्रांतीपर्वाचा साक्षीदार असलेली क्रांतिभूमी आहे. प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांची ही राजधानीच होती. इंग्रज सरकारच्या विरोधातली अनेक खलबत इथे शिजली. या गावात शिरण्याचं ब्रिटिश पोलीसांच धाडस होत नव्हतं. घराघरात भारतभूमीसाठी लढणारे शूर मावळे ही कुंडलची परंपरा आहे.त्यांचा इतिहास नव्या पिढीसाठी  प्रेरणादायी आहे.असे अशोक ढवळे म्हणाले.यावेळी तासगाव येथील दादोजी कोंडदेव सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  शिस्तबद्ध व शानदार संचलन केले.यावेळी अँड दीपक लाड यांनी स्वागत तर जेष्ठ नेते श्रीकांत लाड यांनी प्रास्ताविक केले.यावेळी "नमन स्वातंत्र्याला या विषयी व्याख्याते अविनाश भारती यांचे व्याख्यान झाले. यावेळी अँड सुभाष पाटील, व्ही वाय पाटील, धनाजी लाड, संताजी लाड, प्रल्हाद पाटील, डॉ.गौरी पाटील, अशोक जाधव, पोपटराव सूर्यवंशी, महादेव लाड, जयवंत आवटे, नितीन गवळी आदी उपस्थित होते. यावेळी किरण पाटील, महेश कोडणीकर आणि शिवाजी रावळ यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Sangliसांगली