शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

"गडखिंडीत रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याच्या ऐतिहासिक घटनेचे शेणोलीजवळ स्मारक व्हावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 13:22 IST

७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.

कडेगाव : स्वातंत्र्यलढ्यावेळी सशस्त्र लढ्यासाठी लागणारा पैसा उभारण्यास येडेमच्छिंद्र- शेणोली दरम्यानच्या गडखिंडीत  रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याची इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अशा घटना आजच्या समस्यांशी झगडण्याची प्रेरणा देतात. या शौर्यशाली इतिहासाची नव्या पिढीला ओळख व्हावी, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानीच्या स्मरण व्हावे म्हणून शेणोलीजवळ रेल्वे लुटीच्या घटनेचे स्मारक व्हावे असे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.कुंडल तालुका पलूस येथे प्रतिसरकारच्या तुफान दलाचे झुंझार कॅप्टन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर कॅप्टन रामचंद्र लाड यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न झाला. यावेळी  कॅप्टन रामचंद्र लाड जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या हस्ते रोख ५० हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असलेला पुरस्कार साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार अरुण लाड,  जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, व्याख्याते अविनाश भारती, बाळासाहेब पवार, गौरव नायकवडी,लेखिका कॉ.नमिता वायकर उपस्थित होते.यावेळी बोलताना अशोक ढवळे म्हणाले, कुंडल म्हणजे स्वातंत्र्याच्या धगधगत्या क्रांतीपर्वाचा साक्षीदार असलेली क्रांतिभूमी आहे. प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांची ही राजधानीच होती. इंग्रज सरकारच्या विरोधातली अनेक खलबत इथे शिजली. या गावात शिरण्याचं ब्रिटिश पोलीसांच धाडस होत नव्हतं. घराघरात भारतभूमीसाठी लढणारे शूर मावळे ही कुंडलची परंपरा आहे.त्यांचा इतिहास नव्या पिढीसाठी  प्रेरणादायी आहे.असे अशोक ढवळे म्हणाले.यावेळी तासगाव येथील दादोजी कोंडदेव सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  शिस्तबद्ध व शानदार संचलन केले.यावेळी अँड दीपक लाड यांनी स्वागत तर जेष्ठ नेते श्रीकांत लाड यांनी प्रास्ताविक केले.यावेळी "नमन स्वातंत्र्याला या विषयी व्याख्याते अविनाश भारती यांचे व्याख्यान झाले. यावेळी अँड सुभाष पाटील, व्ही वाय पाटील, धनाजी लाड, संताजी लाड, प्रल्हाद पाटील, डॉ.गौरी पाटील, अशोक जाधव, पोपटराव सूर्यवंशी, महादेव लाड, जयवंत आवटे, नितीन गवळी आदी उपस्थित होते. यावेळी किरण पाटील, महेश कोडणीकर आणि शिवाजी रावळ यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Sangliसांगली