शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराची कोंडी फुटल्याशिवाय ऊसतोड नाही,  रविवारी गाव बंद; नांद्रेतील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 11:56 IST

सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोडी घ्यायच्या नाहीत, असा निर्णय नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्वच शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय गाव बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देसर्व संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थितीवाद बाजूला ठेवून आंदोलन, अन्य संघटनांचेही प्रतिनिधी उपस्थित मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांमध्ये ऊस दराबाबत जनजागृती

सांगली ,दि. ०४ :  जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोडी घ्यायच्या नाहीत, असा निर्णय नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्वच शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय गाव बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला.

नांद्रे येथे शेतकऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, रावसाहेब ऐतवडे, सुभाष पाटील, मनोज पाटील, रावसाहेब पाटील उपस्थित होते.

या बैठकीत शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात तीव्र शब्दात मते व्यक्त केली. शेतीचा उत्पादन खर्च वाढला असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेत नाही. साखर कारखानदारांना पोषक अशीच धोरणे राबवून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. जोपर्यंत सरकार आणि साखर कारखानदार ऊस दराची कोंडी फोडणार नाहीत, तोपर्यंत ऊसतोडी न घेण्याचा निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतला.

सर्व संघटनांनी ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी नांद्रे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच रविवारी नांद्रेसह परिसरातील गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांमध्ये ऊस दराबाबत जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीमध्ये शुक्रवारी घेण्यात आला.

वाद बाजूला ठेवून आंदोलन

नांद्रे येथील शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांचेही प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी, संघटनांचे वाद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनाचा लढा पुकारण्याची विनंती केली. जो शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेईल, त्यांना शेतकऱ्यांचे यापुढे सहकार्य मिळणार नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी भाषणात व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली