शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

सांगली जिल्ह्यात शासनाच्या सात विभागांत लाचखोरीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 12:40 IST

साडेपाच वर्षांतील चित्र; ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचाही फायदा’ तत्त्व अमलात

घनशाम नवाथेसांगली : शासनाच्या अनेक विभागांत टेबलाखालून आणि टेबलावरूनही लाच घेतली जाते. परंतु, असेही काही विभाग आहेत तेथे गेल्या साडेपाच वर्षांत लाचखोरीच झाली नाही. सहकार, आरटीओ, जीवन प्राधिकरण, रजिस्ट्रार, अपंग व वित्त महामंडळ, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खाते येथे लाचखोरीची तक्रारच नसल्यामुळे आश्चर्यच व्यक्त होत आहे.‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ हे राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ब्रीदवाक्य आहे. तुमच्या हक्कासाठी लाच का? असा सवाल करत हा विभाग लाचखोरांना पकडून देण्याचे सातत्याने आवाहन करत असतो. शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याला सापळ्यात पकडून देता येते. तसेच लोकसेवकाने बेहिशोबी मालमत्ता गोळा केली असल्यास त्याचे पुरावे देऊनही कारवाई करता येते. लाचखोरीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक, मोबाइल ॲप, वेबसाइटवर तक्रार नोंदवता येते. तसेच थेट भेटूनही तक्रार करता येते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर लाचेची मागणी केली आहे काय? याची प्रथम पडताळणी केली जाते. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यास सापळा रचून लाचखोरांना पकडण्याची कारवाई केली जाते. लाचलुचपत विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत महसूल विभागात सर्वाधिक लाचखोरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या खालोखाल पोलिस दल, जिल्हा परिषद आदी विभागांत लाचखोरांवर कारवाई होते.सांगली जिल्ह्यात शासनाच्या वेगवेगळ्या ३१ विभागांची यादी बनवली आहे. यातील सहकार, आरटीओ, जीवन प्राधिकरण, रजिस्ट्रार, अपंग व वित्त महामंडळ, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खाते या सात विभागांत २०१९ पासून लाचखोरीची कारवाईच झालेली नाही. ही माहिती वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात हे चित्र दिसते. सहकार, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम, कृषी खाते, जीवन प्राधिकरण हे महत्त्वाचे विभाग आहेत. येथे नागरिकांचा कामानिमित्त थेट संबंध येतो. परंतु, ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा फायदा’ या तत्त्वामुळे लाचखोरीची तक्रारच गेल्या साडेपाच वर्षांत तरी झालेली दिसून येत नाही. एकप्रकारे ही आश्चर्याची बाबच म्हणावी लागेल.

येथे तक्रार करा कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास मोबाइल क्रमांक ९८२१८८०७३७ या क्रमांकावर तसेच टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२३३-२३७३०९५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणGovernmentसरकार