शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'ती' मगर मृत समजताच ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा नि:श्वास, वनविभागाने केले शवविच्छेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 12:38 IST

नदी काठावर आढळलेली मगर मृत असल्याचे वनविभागाकडून घोषित करण्यात आलं आहे.

सांगली - जिल्ह्यातील नांद्रे-ब्रम्हनाळ नदी काठावर स्तब्ध अवस्थेत मगर आढळून आली होती. मगर हा प्राणी स्तब्ध अवस्थेत असला तरी तो हिंसक असल्याने त्याजवळ जाण्याची हिंमत कुणीही करत नाही. त्यामुळे, ती मगर जिवंत आहे की मेलेली हा पेच ग्रामस्थांपुढे होता. स्थानिकांनी त्या मगरीला काठीने आणि इतर वस्तूंनी डवचून पाहिले होते. मात्र, नेमका अंदाज न आल्याने वनविभागाला पाचारण करण्यात आले. त्यावेळी, वन विभागने नदीकिनारी धाव घेत मगरीची जवळ जाऊन तपासणी केली असता, ती मगर मृत असल्याचे निदर्शनास आले. 

नदी काठावर आढळलेली मगर मृत असल्याचे वनविभागाकडून घोषित करण्यात आलं आहे. येथे बारा फुटी मगर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होत. मात्र, कित्येक तास एकाच ठिकाणी मगर आढळल्यानंतर नागरिकांनी आणि प्राणिमित्रांनी त्याची वनविभागाला कल्पना दिली. वनविभागाने जागेवर जाऊन पंचनामा केला. त्यावेळी, वनविभागाने ती मगर मृत झाल्याचे घोषित केले. मगर ताब्यात घेऊन तिचे शवविच्छेदन केले आणि नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

नदी काठावर आढळलेल्या त्या मगरीच वय १५ वर्षांपेक्षा ज्यास्त असण्याची शक्यता असून प्राथमिक अंदाजानुसार त्या मगरीचा नैसर्गिक मृत्यू झाला, असावा असा अंदाज आहे. तसेच दोन मगरींच्या भांडणात मगरीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. मात्र, वनविभागाने अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. वैद्यकीय 'अहवाल' आल्यानंतर त्याची माहिती मिळणार आहे. मगरीचा एक पंजा तुटलेला आणि जबड्याजवळही बऱ्याच झालेल्या मोठ्या जखमा दिसून आल्या आहेत. 

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागforestजंगल