शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील

By शीतल पाटील | Updated: October 28, 2022 19:07 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. त्यासाठी शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करत नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेला अर्थ नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकजण निघून जातील, अशी भीती शिंदे गटाला आहे, अशी गुगली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत टाकली.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळातील अनेक निर्णय फडणवीसच घेत असतात. शिंदे गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. तसे न झाल्यास आमदार आता उद्धव ठाकरेंकडे परत जातील, अशी भीती आहे. शिंदे गटाचे संख्याबळ ३४ पेक्षा कमी झाल्यास राज्य सरकारवर संकट येऊ शकते. त्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात आहे.ते म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. फाॅक्सकॉनपाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेला. तरीही राज्याचे प्रमुख काहीच हालचाल करताना दिसत नाहीत. शिंदे सरकारकडून बेरोजगारांची निराशा झाली आहे. हे उद्योगधंदे टिकविण्याची जबाबदारी सरकारची होती. पण त्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत.रवी राणांना ऊर्जा कुणाची?रवी राणा आणि बच्चू कडू वादाबाबत पाटील म्हणाले की, बच्चू कडूंना मी चांगले ओळखतो. तथ्यहीन आरोप होत असतील तर ते स्वस्थ बसणार नाहीत. अजूनही ते स्वस्थ का बसले आहेत, हे कळत नाही. शिंदे गटातील सर्वांनाच खोके चिकटले आहे. लोकांत बदनामी झाली आहे. भविष्यात त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर आश्चर्य वाटणार नाही. पण आमदार रवी राणांना कोण ऊर्जा देत आहे?

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार