शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील

By शीतल पाटील | Updated: October 28, 2022 19:07 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. त्यासाठी शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करत नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेला अर्थ नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकजण निघून जातील, अशी भीती शिंदे गटाला आहे, अशी गुगली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत टाकली.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळातील अनेक निर्णय फडणवीसच घेत असतात. शिंदे गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. तसे न झाल्यास आमदार आता उद्धव ठाकरेंकडे परत जातील, अशी भीती आहे. शिंदे गटाचे संख्याबळ ३४ पेक्षा कमी झाल्यास राज्य सरकारवर संकट येऊ शकते. त्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात आहे.ते म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. फाॅक्सकॉनपाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेला. तरीही राज्याचे प्रमुख काहीच हालचाल करताना दिसत नाहीत. शिंदे सरकारकडून बेरोजगारांची निराशा झाली आहे. हे उद्योगधंदे टिकविण्याची जबाबदारी सरकारची होती. पण त्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत.रवी राणांना ऊर्जा कुणाची?रवी राणा आणि बच्चू कडू वादाबाबत पाटील म्हणाले की, बच्चू कडूंना मी चांगले ओळखतो. तथ्यहीन आरोप होत असतील तर ते स्वस्थ बसणार नाहीत. अजूनही ते स्वस्थ का बसले आहेत, हे कळत नाही. शिंदे गटातील सर्वांनाच खोके चिकटले आहे. लोकांत बदनामी झाली आहे. भविष्यात त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर आश्चर्य वाटणार नाही. पण आमदार रवी राणांना कोण ऊर्जा देत आहे?

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार