शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील

By शीतल पाटील | Updated: October 28, 2022 19:07 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. त्यासाठी शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करत नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेला अर्थ नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकजण निघून जातील, अशी भीती शिंदे गटाला आहे, अशी गुगली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत टाकली.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळातील अनेक निर्णय फडणवीसच घेत असतात. शिंदे गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. तसे न झाल्यास आमदार आता उद्धव ठाकरेंकडे परत जातील, अशी भीती आहे. शिंदे गटाचे संख्याबळ ३४ पेक्षा कमी झाल्यास राज्य सरकारवर संकट येऊ शकते. त्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात आहे.ते म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. फाॅक्सकॉनपाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेला. तरीही राज्याचे प्रमुख काहीच हालचाल करताना दिसत नाहीत. शिंदे सरकारकडून बेरोजगारांची निराशा झाली आहे. हे उद्योगधंदे टिकविण्याची जबाबदारी सरकारची होती. पण त्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत.रवी राणांना ऊर्जा कुणाची?रवी राणा आणि बच्चू कडू वादाबाबत पाटील म्हणाले की, बच्चू कडूंना मी चांगले ओळखतो. तथ्यहीन आरोप होत असतील तर ते स्वस्थ बसणार नाहीत. अजूनही ते स्वस्थ का बसले आहेत, हे कळत नाही. शिंदे गटातील सर्वांनाच खोके चिकटले आहे. लोकांत बदनामी झाली आहे. भविष्यात त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर आश्चर्य वाटणार नाही. पण आमदार रवी राणांना कोण ऊर्जा देत आहे?

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार