शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रच संकटग्रस्त, शासनाकडून निधीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 15:38 IST

तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने २००५-०६ च्या महापुरानंतर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राची उभारणी केली.

शीतल पाटीलसांगली : तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने २००५-०६ च्या महापुरानंतर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राची उभारणी केली. या केंद्राच्या माध्यमातून चार जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्याचा उद्देश ठेवण्यात आला. त्याची जबाबदारी सांगली महापालिकेवर टाकण्यात आली. मोठा गाजावाजा करून उभारलेले हे केंद्र आता निधीअभावी शेवटची घटका मोजत आहे.जुलै २००५ मध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी एक प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले. या केंद्राचे मुख्यालय सांगली महापालिका निश्चित केले गेले, तर आयुक्त हे केंद्राचे प्रमुख असतील, असे शासनाने स्पष्ट केले.आता केंद्र उभारून १६ वर्षांचा काळ लोटला आहे. या केंद्राच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्याची घोषणा महापुराच्या पाण्याबरोबरच वाहून गेली आहे. हे केंद्र मृत्युशय्येवर असून महापालिकेच्या मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा फलकही गायब झाला आहे.केंद्राचा उद्देश

आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारताना शासनाने काही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली होती. नागरी भागातील आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्याबरोबरच जनतेत जागृती निर्माण करणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, मदत व बचाव कार्य पथके नियुक्त करणे आदी हेतू होता. पण हा उद्देशच नंतरच्या काळात हवेत विरला आहे.

केवळ एक कोटीचा निधी२००६ साली स्थापन करण्यात आलेल्या या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थान केंद्राला आठ ते नऊ वर्षे शासनाने निधीच दिला नाही. २०१५ मध्ये शासनाकडून एक कोटीचा निधी आला होता. त्यातून कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रत्येकी १० लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. उर्वरित निधीतून सांगली महापालिकेने दोन रेस्क्यू वाहने खरेदी केली. त्यानंतर आजअखेर एक पैसाही केंद्रांना मिळाला नाही. आता तर हे केंद्रच विस्मृतीत गेले आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या समस्या

सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत महापुराची समस्या गंभीर आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टी, वादळ, दरड कोसळणे या समस्या आहेत. वेगवेगळ्या समस्यांमुळे एकसमानता नसल्याने आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या कामात समन्वय राहू शकला नाही.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर