शिराळा : सांगली जिल्ह्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित केलेला खरेदी विक्री दारांची एकत्रित चर्चा भेट संमेलन या उपक्रमाची शासन स्तरावर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना थेट, विश्वासू खरेदीदार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. संमेलनाचे यश पाहता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आप-आपल्या जिल्ह्यात “सांगली पॅटर्न”राबविण्याच्या सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात उत्पादित होणा-या कृषि उत्पादने, फळे, प्रक्रीया केलीली कृषि उत्पादने यांना हमखास व स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतक-यांना नवीन बाजार पेठांचा लाभ घेता यावा व जिल्ह्यांचा आर्थिकस्तर वाढविण्याकरिता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मित्रा, मुंबई, कृषी विभाग व अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.सदर संमेलनात विविध प्रक्रीया उद्योजक, व्यापारी, निर्यातदार आणि मार्केटिंग कंपन्यांनी शेतक-यांशी थेट चर्चेव्दारे करार केले. एकुण १४.३९ कोटीचे व्यवहार ठरल्याने सांगली जिल्ह्यातील कृषि क्षेत्राला मोठा आर्थिक लाभ मिळाला. वरील संमेलनाचे यश पाहता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आप-आपल्या जिल्ह्यात आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांसह कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी असे संमेलन आयोजित केल्यास राज्यातील कृषिक्षेत्राला व शेतक-यांचे अर्थकारणात सकारात्मक बदल होईल. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होईल व जिल्ह्यांचा आर्थिकस्तर वाढेल. त्यामुळे असे संमेलन आपल्याकडून कृषी उपजांच्या विपणनासाठी आयोजन करुन त्यांच्या आर्थिक सामाजिक परीणामाच्या विवेचनासह अहवाल पाठवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.लोकाभिमुख दृष्टिकोनशेतकरी, खरेदीदार, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ यांना एका व्यासपीठावर आणण्याचे यश सांगलीने मिळवले आहे. या उपक्रमामुळे पारदर्शक व्यवहार व परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपक्रमाच्या यशाची दखल घेत मा. मंत्री, पणन यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना “सांगली पॅटर्न” राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.कष्टकरी शेतकरी, संवेदनशील प्रशासन व एकमेकांना सहकार्य करण्याची भावना यांचे हे सामूहिक यश आहे. नवकल्पना व लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे सांगली जिल्ह्याचा आदर्श पुन्हा अधोरेखित झाला.
Web Summary : Inspired by Sangli's successful farmer-buyer meet, Maharashtra will implement the 'Sangli Pattern' statewide. This initiative aims to boost farmer income by connecting them directly with reliable buyers, fostering transparent deals and economic growth in agriculture.
Web Summary : सांगली के सफल किसान-खरीदार सम्मेलन से प्रेरित होकर, महाराष्ट्र 'सांगली पैटर्न' को राज्यव्यापी लागू करेगा। इसका उद्देश्य किसानों को विश्वसनीय खरीदारों से जोड़कर, पारदर्शी सौदों और कृषि में आर्थिक विकास को बढ़ावा देना है।