शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

नॅरोगेजवरील रेल्वे बरी..नऊ तासांचा प्रवास १७ तासांवर; मुंबई-सांगली-कोल्हापूर मार्गावर शिजतंय कारस्थान?

By अविनाश कोळी | Updated: September 25, 2023 12:01 IST

प्रवासी म्हणतात..बैलगाडी बरी

अविनाश कोळीसांगली : मुंबई-सांगली-कोल्हापूर रेल्वे मार्गावर गाड्या तोट्यात धावतात, हे दाखवण्यासाठी नऊ तासांच्या प्रवासाची गाडी चक्क १७ तासांत सांगलीत पोहोचवली जातेय. आधुनिक गाड्यांपेक्षा नॅरोगेजवरील रेल्वे बऱ्या, अशा शब्दांत प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनाचे हे कारस्थान असल्याची शंका प्रवासी संघटनांनी उपस्थित केली आहे.

मध्य रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे सांगलीमार्गे धावणाऱ्या मुंबई-कोल्हापूर विशेष गाड्या मुंबई-सांगली प्रवासासाठी नऊ तासांऐवजी १७ तास घेत आहेत. सुरुवातीला नव्वद टक्के बुकिंग असलेल्या या गाड्यांचे बुकिंग भविष्यात कमी होईल. त्यामुळे रेल्वेचे प्रचंड नुकसान होते. नेमकी हीच बाब सांगली, कोल्हापूरसाठी धोक्याची आहे. बुकिंग व तोट्याचे आकडे पुढे करीत या मार्गावरील नव्या गाड्यांना मंजुरी नाकारली जाण्याची भीती आहे.

या गाड्या धावल्या उशिरा१२ ऑगस्ट : गाडी (क्र. ०१०९९) तब्बल सहा तास उशिरा सांगलीत पोहोचली. या गाडीत ९० टक्के बुकिंग होते. तरीही गाडीने दुप्पट वेळ घेतला.१३ ऑगस्ट : सांगली स्टेशन पोहोचण्याची वेळ सकाळी ९:४० वाजताची होती; पण ही गाडी दुपारी २ वाजता सांगलीत पोहोचली.

प्रवासी म्हणतात..बैलगाडी बरीपुढीलवेळी एक्स्प्रेस गाड्यांचा असा बैलगाडीच्या वेगाने प्रवास करणार नसल्याचा पवित्रा सांगली, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी व कोल्हापूरच्या लोकांनी घेतला आहे. वाईट अनुभवामुळे २३ सप्टेंबर रोजी सोडलेल्या मुंबई-कोल्हापूर विशेष गाडीला लोकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. यातील सुमारे ९५५ सीट्स रिकाम्या राहिल्या.

सकाळची गाडी आली सायंकाळीमध्य रेल्वेने ऑगस्टमधील अनुभव घेऊनही तोच कित्ता गिरवित २३ सप्टेंबरच्या विशेष गाडीला ८ तास उशीर केला. ही गाडी मुंबईहून सांगलीत सकाळी ९:४० वाजता पोहोचणार होती; पण ती सायंकाळी साडेपाच वाजता आली, असे रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे रोहित गोडबोले यांनी सांगितले.

विजेवरील गाड्या, कोळशाला लाजविताहेतमुंबई-सांगली-कोल्हापूर रेल्वे मार्ग शंभर टक्के विद्युत इंजिनवर चालतो व हा मार्ग इतर मार्गांपेक्षा मोकळा असतो. तरीही कोळशावरील गाड्या लाजतील, अशा मंदगतीने या मार्गावर गाड्या धावताहेत, असे मत रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे उमेश शहा यांनी सांगितले.

कोल्हापूर, सांगली व मुंबई मार्गावर नव्या गाड्या मंजूर व्हाव्यात, येथील प्रवाशांचा प्रवास सोयीचा व जलदगतीने व्हावा, यासाठी अनेक वर्षे प्रवासी व संघटनांची धडपड सुरू आहे. तरीही मध्य रेल्वे प्रशासनाचा हा अडथळा आणण्याचा कारभार अयोग्य आहे. -कौशिक मालू, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे