शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नॅरोगेजवरील रेल्वे बरी..नऊ तासांचा प्रवास १७ तासांवर; मुंबई-सांगली-कोल्हापूर मार्गावर शिजतंय कारस्थान?

By अविनाश कोळी | Updated: September 25, 2023 12:01 IST

प्रवासी म्हणतात..बैलगाडी बरी

अविनाश कोळीसांगली : मुंबई-सांगली-कोल्हापूर रेल्वे मार्गावर गाड्या तोट्यात धावतात, हे दाखवण्यासाठी नऊ तासांच्या प्रवासाची गाडी चक्क १७ तासांत सांगलीत पोहोचवली जातेय. आधुनिक गाड्यांपेक्षा नॅरोगेजवरील रेल्वे बऱ्या, अशा शब्दांत प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनाचे हे कारस्थान असल्याची शंका प्रवासी संघटनांनी उपस्थित केली आहे.

मध्य रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे सांगलीमार्गे धावणाऱ्या मुंबई-कोल्हापूर विशेष गाड्या मुंबई-सांगली प्रवासासाठी नऊ तासांऐवजी १७ तास घेत आहेत. सुरुवातीला नव्वद टक्के बुकिंग असलेल्या या गाड्यांचे बुकिंग भविष्यात कमी होईल. त्यामुळे रेल्वेचे प्रचंड नुकसान होते. नेमकी हीच बाब सांगली, कोल्हापूरसाठी धोक्याची आहे. बुकिंग व तोट्याचे आकडे पुढे करीत या मार्गावरील नव्या गाड्यांना मंजुरी नाकारली जाण्याची भीती आहे.

या गाड्या धावल्या उशिरा१२ ऑगस्ट : गाडी (क्र. ०१०९९) तब्बल सहा तास उशिरा सांगलीत पोहोचली. या गाडीत ९० टक्के बुकिंग होते. तरीही गाडीने दुप्पट वेळ घेतला.१३ ऑगस्ट : सांगली स्टेशन पोहोचण्याची वेळ सकाळी ९:४० वाजताची होती; पण ही गाडी दुपारी २ वाजता सांगलीत पोहोचली.

प्रवासी म्हणतात..बैलगाडी बरीपुढीलवेळी एक्स्प्रेस गाड्यांचा असा बैलगाडीच्या वेगाने प्रवास करणार नसल्याचा पवित्रा सांगली, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी व कोल्हापूरच्या लोकांनी घेतला आहे. वाईट अनुभवामुळे २३ सप्टेंबर रोजी सोडलेल्या मुंबई-कोल्हापूर विशेष गाडीला लोकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. यातील सुमारे ९५५ सीट्स रिकाम्या राहिल्या.

सकाळची गाडी आली सायंकाळीमध्य रेल्वेने ऑगस्टमधील अनुभव घेऊनही तोच कित्ता गिरवित २३ सप्टेंबरच्या विशेष गाडीला ८ तास उशीर केला. ही गाडी मुंबईहून सांगलीत सकाळी ९:४० वाजता पोहोचणार होती; पण ती सायंकाळी साडेपाच वाजता आली, असे रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे रोहित गोडबोले यांनी सांगितले.

विजेवरील गाड्या, कोळशाला लाजविताहेतमुंबई-सांगली-कोल्हापूर रेल्वे मार्ग शंभर टक्के विद्युत इंजिनवर चालतो व हा मार्ग इतर मार्गांपेक्षा मोकळा असतो. तरीही कोळशावरील गाड्या लाजतील, अशा मंदगतीने या मार्गावर गाड्या धावताहेत, असे मत रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे उमेश शहा यांनी सांगितले.

कोल्हापूर, सांगली व मुंबई मार्गावर नव्या गाड्या मंजूर व्हाव्यात, येथील प्रवाशांचा प्रवास सोयीचा व जलदगतीने व्हावा, यासाठी अनेक वर्षे प्रवासी व संघटनांची धडपड सुरू आहे. तरीही मध्य रेल्वे प्रशासनाचा हा अडथळा आणण्याचा कारभार अयोग्य आहे. -कौशिक मालू, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे