शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

नॅरोगेजवरील रेल्वे बरी..नऊ तासांचा प्रवास १७ तासांवर; मुंबई-सांगली-कोल्हापूर मार्गावर शिजतंय कारस्थान?

By अविनाश कोळी | Updated: September 25, 2023 12:01 IST

प्रवासी म्हणतात..बैलगाडी बरी

अविनाश कोळीसांगली : मुंबई-सांगली-कोल्हापूर रेल्वे मार्गावर गाड्या तोट्यात धावतात, हे दाखवण्यासाठी नऊ तासांच्या प्रवासाची गाडी चक्क १७ तासांत सांगलीत पोहोचवली जातेय. आधुनिक गाड्यांपेक्षा नॅरोगेजवरील रेल्वे बऱ्या, अशा शब्दांत प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनाचे हे कारस्थान असल्याची शंका प्रवासी संघटनांनी उपस्थित केली आहे.

मध्य रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे सांगलीमार्गे धावणाऱ्या मुंबई-कोल्हापूर विशेष गाड्या मुंबई-सांगली प्रवासासाठी नऊ तासांऐवजी १७ तास घेत आहेत. सुरुवातीला नव्वद टक्के बुकिंग असलेल्या या गाड्यांचे बुकिंग भविष्यात कमी होईल. त्यामुळे रेल्वेचे प्रचंड नुकसान होते. नेमकी हीच बाब सांगली, कोल्हापूरसाठी धोक्याची आहे. बुकिंग व तोट्याचे आकडे पुढे करीत या मार्गावरील नव्या गाड्यांना मंजुरी नाकारली जाण्याची भीती आहे.

या गाड्या धावल्या उशिरा१२ ऑगस्ट : गाडी (क्र. ०१०९९) तब्बल सहा तास उशिरा सांगलीत पोहोचली. या गाडीत ९० टक्के बुकिंग होते. तरीही गाडीने दुप्पट वेळ घेतला.१३ ऑगस्ट : सांगली स्टेशन पोहोचण्याची वेळ सकाळी ९:४० वाजताची होती; पण ही गाडी दुपारी २ वाजता सांगलीत पोहोचली.

प्रवासी म्हणतात..बैलगाडी बरीपुढीलवेळी एक्स्प्रेस गाड्यांचा असा बैलगाडीच्या वेगाने प्रवास करणार नसल्याचा पवित्रा सांगली, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी व कोल्हापूरच्या लोकांनी घेतला आहे. वाईट अनुभवामुळे २३ सप्टेंबर रोजी सोडलेल्या मुंबई-कोल्हापूर विशेष गाडीला लोकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. यातील सुमारे ९५५ सीट्स रिकाम्या राहिल्या.

सकाळची गाडी आली सायंकाळीमध्य रेल्वेने ऑगस्टमधील अनुभव घेऊनही तोच कित्ता गिरवित २३ सप्टेंबरच्या विशेष गाडीला ८ तास उशीर केला. ही गाडी मुंबईहून सांगलीत सकाळी ९:४० वाजता पोहोचणार होती; पण ती सायंकाळी साडेपाच वाजता आली, असे रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे रोहित गोडबोले यांनी सांगितले.

विजेवरील गाड्या, कोळशाला लाजविताहेतमुंबई-सांगली-कोल्हापूर रेल्वे मार्ग शंभर टक्के विद्युत इंजिनवर चालतो व हा मार्ग इतर मार्गांपेक्षा मोकळा असतो. तरीही कोळशावरील गाड्या लाजतील, अशा मंदगतीने या मार्गावर गाड्या धावताहेत, असे मत रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे उमेश शहा यांनी सांगितले.

कोल्हापूर, सांगली व मुंबई मार्गावर नव्या गाड्या मंजूर व्हाव्यात, येथील प्रवाशांचा प्रवास सोयीचा व जलदगतीने व्हावा, यासाठी अनेक वर्षे प्रवासी व संघटनांची धडपड सुरू आहे. तरीही मध्य रेल्वे प्रशासनाचा हा अडथळा आणण्याचा कारभार अयोग्य आहे. -कौशिक मालू, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे