शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

चंद्रकांत पाटलांची नाही 'ती' तर भाजपचीच मानसिकता, खासदार प्रियंका चतुर्वेदींचे जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 16:40 IST

शिवसेनेच्या ह्दयात, वागण्यात हिंदुत्त्व आहे, मात्र भाजपचे हिंदुत्त्व हे राजकीय स्वार्थाचे आहे. याच हिंदुत्त्ववादाचा फायदा ते सत्तेसाठी घेतात.

सांगली : एका क्षेत्रात पुढे आलेल्या महिलेला घरात जाऊन स्वयंपाक करायला व स्मशानात जायला सांगणारे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देशातील सर्व महिलांचा अवमान केला आहे. भाजप नेत्यांची महिलांप्रती कसी मानसिकता आहे, हे यातून दिसून येते, अशी टीका शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.त्या म्हणाल्या की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य लाजीरवाणे व महिलांप्रती अवमानकारक आहे. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुढे येत आहेत. राजकारणातही महिलांनी गरुरभरारी घेतली आहे. अशात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर संसदरत्न पुरस्कार जिंकला आहे. त्यांच्या कर्तृत्वावर संसदेने शिक्कामोर्तब केले असताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना राजकारण सोडून स्वयंपाक करायला जाण्याचा व स्मशानात जाण्याचा सल्ला दिला. ही केवळ चंद्रकांत पाटील यांचीच नव्हे तर भाजपचीच मानसिकता आहे. या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी देशातील महिला वर्गाची माफी मागायला हवी.शिवसेना झुकणार नाहीभाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. या यंत्रणांना भाजपने राजकीय बनविल्यामुळे लोकांचा या यंत्रणांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे कुठेही छाापा पडला तर लोकांना त्यामागचे राजकारण कळते. तरीही या दबावतंत्राने शिवसेना कधीच झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.राष्ट्रवादीशी असलेला संघर्ष सुटेलइस्लामपूरसह सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. सामंजस्याने व समन्वयाने हा संघर्ष थांबविण्यात येईल, असे चतुर्वेदी म्हणाल्या.

संपर्क अभियानाचा फायदा होईल

शिवसेना संपर्क अभियानातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अडचणी व मते नोंदवून मुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल देणार आहोत. हे् प्रश्न नक्की सुटतील व संपर्क अभियानातून पक्षाला फायदा होईल, असे चतुर्वेदी म्हणाल्या.

भाजपचे हिंदुत्त्व राजकीय फायद्याचेशिवसेनेच्या ह्दयात, वागण्यात हिंदुत्त्व आहे, मात्र भाजपचे हिंदुत्त्व हे राजकीय स्वार्थाचे आहे. याच हिंदुत्त्ववादाचा फायदा ते सत्तेसाठी घेतात. देशात सध्या मंदिर व मशिदीचा वाद निर्माण करुन महागाई व बेराेजगारीच्या प्रश्नावरुन लोकांचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका चतुर्वेदी यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाchandrakant patilचंद्रकांत पाटील