शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात गेल्या २० वर्षांतील नीचांकी पेरणी, कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता

By अशोक डोंबाळे | Updated: July 5, 2023 11:53 IST

खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओस

सांगली : जिल्ह्यात आतापर्यंत किमान १३५.५ मिलिमीटरपर्यंत पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ५.५ टक्केच झाला आहे. परिणामी जिल्ह्यात खरीप पेरण्या गेल्या २० वर्षांतील नीचांकी म्हणजे केवळ ५.२६ टक्के झाल्या आहेत. खरीप पेरण्या लांबल्यामुळे कडधान्याचे पेरणी क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. यापैकी २८ जून २०२३ पर्यंत केवळ १३ हजार ४५८.५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५.२६ टक्केच पेरणी झाली आहे. गेल्या २० वर्षांतील खरीप पेरण्यांची आकडेवारी लक्षात घेतल्यास जवळपास ३५ ते ६० टक्केपर्यंत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होत होती, तसेच मान्सून पाऊसही १०० मिलिमीटरपर्यंत होत होता; परंतु यावर्षी जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यास सुरुवात झाली आहे.तरीही जिल्ह्यात ५.५ टक्केच पाऊस झाल्याची सांगली पाटबंधारे विभागाची माहिती आहे, तसेच केवळ ५.२६ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पाऊस आणि खरीप पेरण्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. कडधान्याचे पेरणी क्षेत्रही जिल्ह्यात घटण्याची शक्यता असल्याचे कृषी तज्ज्ञांचा अहवाल आहे. धूळ वाफेवर झालेले भात पीकही अडचणीत आले आहे.जिल्ह्यात अशी झाली पेरणीतालुका - सरासरी क्षेत्र - पेरणी - टक्केवारीमिरज -२४६७१.१  - ३१३ - १.३जत - ७८२१० - ९८५.१ - १.४खानापूर - १६१०० - २०१.१ - ०.५६वाळवा - २३१२२ - ४५६ - २तासगाव - ३३१२२ - १५६ - ०.३४शिराळा - २२६०५ - १०७५० - ४५आटपाडी - १०७५० - १६३  - १.५क. महांकाळ - २१३७३.९ - १०६७.४ - ५पलूस - ६१०८ - ३०४ - ५कडेगाव - १९९१६ - ४२२ २. - ३४एकूण - २५५९८४ - १३४५८.५ - ५.२६वर्षनिहाय ३ जुलैपर्यंतची पेरणीवर्ष -   टक्केवारी२०२३    ५.२६२०२२     ३५२०२१      ३२२०२०      ४४२०१९      ५२शिराळ्यात १०१७० हेक्टरवर भाताची पेरणीशिराळा तालुक्यात भात पेरणीचे १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १० हजार १४२ हेक्टरवर भाताची पेरणी उरकली आहे. ७४.४६ टक्के भाताची पेरणी झाली असून पावसाअभावी भात पीकही संकटात सापडले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओसजिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होते; परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी बियाणे, खते खरेदीसाठीही पुढे आले नसल्याचे चित्र असल्यामुळे कृषी सेवा केंद्रे ओस पडली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी