शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सांगली जिल्ह्यात गेल्या २० वर्षांतील नीचांकी पेरणी, कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता

By अशोक डोंबाळे | Updated: July 5, 2023 11:53 IST

खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओस

सांगली : जिल्ह्यात आतापर्यंत किमान १३५.५ मिलिमीटरपर्यंत पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ५.५ टक्केच झाला आहे. परिणामी जिल्ह्यात खरीप पेरण्या गेल्या २० वर्षांतील नीचांकी म्हणजे केवळ ५.२६ टक्के झाल्या आहेत. खरीप पेरण्या लांबल्यामुळे कडधान्याचे पेरणी क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. यापैकी २८ जून २०२३ पर्यंत केवळ १३ हजार ४५८.५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५.२६ टक्केच पेरणी झाली आहे. गेल्या २० वर्षांतील खरीप पेरण्यांची आकडेवारी लक्षात घेतल्यास जवळपास ३५ ते ६० टक्केपर्यंत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होत होती, तसेच मान्सून पाऊसही १०० मिलिमीटरपर्यंत होत होता; परंतु यावर्षी जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यास सुरुवात झाली आहे.तरीही जिल्ह्यात ५.५ टक्केच पाऊस झाल्याची सांगली पाटबंधारे विभागाची माहिती आहे, तसेच केवळ ५.२६ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पाऊस आणि खरीप पेरण्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. कडधान्याचे पेरणी क्षेत्रही जिल्ह्यात घटण्याची शक्यता असल्याचे कृषी तज्ज्ञांचा अहवाल आहे. धूळ वाफेवर झालेले भात पीकही अडचणीत आले आहे.जिल्ह्यात अशी झाली पेरणीतालुका - सरासरी क्षेत्र - पेरणी - टक्केवारीमिरज -२४६७१.१  - ३१३ - १.३जत - ७८२१० - ९८५.१ - १.४खानापूर - १६१०० - २०१.१ - ०.५६वाळवा - २३१२२ - ४५६ - २तासगाव - ३३१२२ - १५६ - ०.३४शिराळा - २२६०५ - १०७५० - ४५आटपाडी - १०७५० - १६३  - १.५क. महांकाळ - २१३७३.९ - १०६७.४ - ५पलूस - ६१०८ - ३०४ - ५कडेगाव - १९९१६ - ४२२ २. - ३४एकूण - २५५९८४ - १३४५८.५ - ५.२६वर्षनिहाय ३ जुलैपर्यंतची पेरणीवर्ष -   टक्केवारी२०२३    ५.२६२०२२     ३५२०२१      ३२२०२०      ४४२०१९      ५२शिराळ्यात १०१७० हेक्टरवर भाताची पेरणीशिराळा तालुक्यात भात पेरणीचे १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १० हजार १४२ हेक्टरवर भाताची पेरणी उरकली आहे. ७४.४६ टक्के भाताची पेरणी झाली असून पावसाअभावी भात पीकही संकटात सापडले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओसजिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होते; परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी बियाणे, खते खरेदीसाठीही पुढे आले नसल्याचे चित्र असल्यामुळे कृषी सेवा केंद्रे ओस पडली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी