शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी?

By हणमंत पाटील | Updated: October 28, 2023 16:52 IST

पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचे तीनतेरा

हणमंत पाटील

सांगली : सांगलीकरांची तहान भागविण्यासाठी अखेर कोयनेतून १०५० क्युसेक पाणी शुक्रवारी सोडण्यात आले. तरीही कृष्णेत सोडलेले पाणी साठविण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचे कोणतेही नियोजन नाही. शहरातील आयर्विन ब्रीजच्या बाजूला असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे गंजले असून, ते तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे कृष्णेत आलेले पाणी साठविण्यास पाटबंधारे विभाग असमर्थ असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.पावसाने ताण दिल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. जिल्ह्यातील नदीकाठावरील पिके सुकून जाऊ लागली. शिवाय शहराला केवळ पाच दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांनी कोयनेतून पाणी सोडण्यासाठी तीव्र आंदोलने केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांना विदर्भ दौरा सोडून शुक्रवारी सांगलीत दाखल व्हावे लागले. शिवाय सकाळी कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. आता हे पाणी दोन दिवसांत सांगलीत दाखल होईल; परंतु पाणी साठविण्यासाठी सांगली पाटबंधारे विभाग अकार्यक्षम असल्याची वस्तुस्थिती आहे.कोयनेने दिले, पण कृष्णेत वाया..एका बाजूला सांगलीकरांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे कृष्णेत पाणी सोडण्यात आले; मात्र हे पाणी साठविण्यास सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाची यंत्रणा सक्षम नसल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी शहरातील कोल्हापूर बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेरी नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले. तसेच, कचरा, प्लास्टिक, माती व वाळूने बंधारा भरला आहे. त्यामुळे पाणी साठविण्याची बंधाऱ्याची क्षमता राहिलेली नाही. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याला बसविलेले लोखंडी दरवाजे गंजले आहेत. अनेक ठिकाणी दरवाज्याला मोठी छिद्रे पडून ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याची विदारक स्थिती आहे.

सांगलीतील पाटबंधारे विभागाच्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे जुने झाले आहेत. त्यामुळे नवीन दरवाजे बसविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. - आदित्य मोहिते, शाखा अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग. 

गेल्या अनेक वर्षांपासून बंधाऱ्याला नवीन दरवाजे बसविण्याची आम्ही मागणी करतोय; परंतु शहर व जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयी सत्ताधारी नेते व प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नाही. ढिम्म प्रशासनावर कारवाई करून तातडीने नवीन दरवाजे बसविले पाहिजेत. - संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी