शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी?

By हणमंत पाटील | Updated: October 28, 2023 16:52 IST

पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचे तीनतेरा

हणमंत पाटील

सांगली : सांगलीकरांची तहान भागविण्यासाठी अखेर कोयनेतून १०५० क्युसेक पाणी शुक्रवारी सोडण्यात आले. तरीही कृष्णेत सोडलेले पाणी साठविण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचे कोणतेही नियोजन नाही. शहरातील आयर्विन ब्रीजच्या बाजूला असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे गंजले असून, ते तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे कृष्णेत आलेले पाणी साठविण्यास पाटबंधारे विभाग असमर्थ असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.पावसाने ताण दिल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. जिल्ह्यातील नदीकाठावरील पिके सुकून जाऊ लागली. शिवाय शहराला केवळ पाच दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांनी कोयनेतून पाणी सोडण्यासाठी तीव्र आंदोलने केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांना विदर्भ दौरा सोडून शुक्रवारी सांगलीत दाखल व्हावे लागले. शिवाय सकाळी कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. आता हे पाणी दोन दिवसांत सांगलीत दाखल होईल; परंतु पाणी साठविण्यासाठी सांगली पाटबंधारे विभाग अकार्यक्षम असल्याची वस्तुस्थिती आहे.कोयनेने दिले, पण कृष्णेत वाया..एका बाजूला सांगलीकरांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे कृष्णेत पाणी सोडण्यात आले; मात्र हे पाणी साठविण्यास सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाची यंत्रणा सक्षम नसल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी शहरातील कोल्हापूर बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेरी नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले. तसेच, कचरा, प्लास्टिक, माती व वाळूने बंधारा भरला आहे. त्यामुळे पाणी साठविण्याची बंधाऱ्याची क्षमता राहिलेली नाही. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याला बसविलेले लोखंडी दरवाजे गंजले आहेत. अनेक ठिकाणी दरवाज्याला मोठी छिद्रे पडून ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याची विदारक स्थिती आहे.

सांगलीतील पाटबंधारे विभागाच्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे जुने झाले आहेत. त्यामुळे नवीन दरवाजे बसविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. - आदित्य मोहिते, शाखा अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग. 

गेल्या अनेक वर्षांपासून बंधाऱ्याला नवीन दरवाजे बसविण्याची आम्ही मागणी करतोय; परंतु शहर व जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयी सत्ताधारी नेते व प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नाही. ढिम्म प्रशासनावर कारवाई करून तातडीने नवीन दरवाजे बसविले पाहिजेत. - संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी