शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी?

By हणमंत पाटील | Updated: October 28, 2023 16:52 IST

पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचे तीनतेरा

हणमंत पाटील

सांगली : सांगलीकरांची तहान भागविण्यासाठी अखेर कोयनेतून १०५० क्युसेक पाणी शुक्रवारी सोडण्यात आले. तरीही कृष्णेत सोडलेले पाणी साठविण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचे कोणतेही नियोजन नाही. शहरातील आयर्विन ब्रीजच्या बाजूला असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे गंजले असून, ते तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे कृष्णेत आलेले पाणी साठविण्यास पाटबंधारे विभाग असमर्थ असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.पावसाने ताण दिल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. जिल्ह्यातील नदीकाठावरील पिके सुकून जाऊ लागली. शिवाय शहराला केवळ पाच दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांनी कोयनेतून पाणी सोडण्यासाठी तीव्र आंदोलने केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांना विदर्भ दौरा सोडून शुक्रवारी सांगलीत दाखल व्हावे लागले. शिवाय सकाळी कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. आता हे पाणी दोन दिवसांत सांगलीत दाखल होईल; परंतु पाणी साठविण्यासाठी सांगली पाटबंधारे विभाग अकार्यक्षम असल्याची वस्तुस्थिती आहे.कोयनेने दिले, पण कृष्णेत वाया..एका बाजूला सांगलीकरांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे कृष्णेत पाणी सोडण्यात आले; मात्र हे पाणी साठविण्यास सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाची यंत्रणा सक्षम नसल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी शहरातील कोल्हापूर बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेरी नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले. तसेच, कचरा, प्लास्टिक, माती व वाळूने बंधारा भरला आहे. त्यामुळे पाणी साठविण्याची बंधाऱ्याची क्षमता राहिलेली नाही. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याला बसविलेले लोखंडी दरवाजे गंजले आहेत. अनेक ठिकाणी दरवाज्याला मोठी छिद्रे पडून ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याची विदारक स्थिती आहे.

सांगलीतील पाटबंधारे विभागाच्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे जुने झाले आहेत. त्यामुळे नवीन दरवाजे बसविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. - आदित्य मोहिते, शाखा अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग. 

गेल्या अनेक वर्षांपासून बंधाऱ्याला नवीन दरवाजे बसविण्याची आम्ही मागणी करतोय; परंतु शहर व जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयी सत्ताधारी नेते व प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नाही. ढिम्म प्रशासनावर कारवाई करून तातडीने नवीन दरवाजे बसविले पाहिजेत. - संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी