शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- अबब! टेंभू, ताकारी, म्हैसाळचा खर्च पोहोचला १५,६४२ कोटींवर, अपूर्ण योजनांसाठी किती कोटींची गरज.. वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: July 18, 2025 12:40 IST

लाभक्षेत्र वाढल्यामुळे शासनाकडून ८ टीएमसी जादा पाणी उचलण्यास मंजुरी मिळाली आहे

अशोक डोंबाळेसांगली : दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा खर्च १५ हजार ६४२ कोटींवर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत नऊ हजार २५५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, उर्वरित अपूर्ण कामांसाठी सहा हजार ३८७ कोटी रुपये निधीची गरज आहे.टेंभू योजनेला १९९५ मध्ये युती सरकारच्या कालावधीत मंजुरी मिळाली. या योजनेचा मूळ खर्च एक हजार ४१६ कोटी ५९ लाख रुपये अपेक्षित होता. योजनेला कृष्णा नदीतून २२.९० टीएमसी पाणी उचलण्याची मंजुरी होती. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील ८० हजार हेक्टर लाभक्षेत्र होते. गेल्या ३० वर्षांत लाभक्षेत्रात ८८ हजार ८५० हेक्टर लाभक्षेत्र वाढून १ लाख ६८ हजार ८५० हेक्टर झाले आहे. लाभक्षेत्र वाढल्यामुळे शासनाकडून ८ टीएमसी जादा पाणी उचलण्यास मंजुरी मिळाली आहे. लाभक्षेत्र वाढल्यामुळे टेंभू योजनेचा खर्च गेल्या ३० वर्षांत आठ हजार २७२ कोटींवर पोहोचला आहे. आतापर्यंत या योजनेवर पाच हजार १३० कोटी रुपये खर्च करून कऱ्हाड, कडेगाव, खानापूर, खटाव, तासगाव, आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यांतील एक लाख ११ हजार ८५७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या या योजनेला तीन हजार २४५ कोटी रुपयांची गरज आहे.जिल्ह्यातील दुसरी मोठी योजना कृष्णा-कोयना म्हणजेच ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजना आहे. या योजनेचा शुभारंभ तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते १९८४-८५ मध्ये झाला आहे. त्यावेळी ८२ कोटींचा निधी मंजूर केला. ज्यामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेसाठी २७ कोटींची तरतूद होती.पुढे म्हैसाळ सिंचन योजनेसाठी स्वतंत्र निधी मिळू लागला. दि. २७ मार्च १९८६ रोजी म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामाचे स्वतंत्र उद्घाटन झाले. आता ४१ वर्षांनंतर सध्याच्या ताकारी-म्हैसाळ योजनेचा खर्च आठ हजार २७२ कोटींवर गेला आहे. यामध्ये जत पूर्व भागासाठीच्या सुधारित म्हैसाळ योजनेच्या खर्चाचाही समावेश आहे. 

निधीअभावी कामे रखडली

  • आतापर्यंत या योजनांवर पाच हजार १३० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, एक लाख ६५ हजार ६४१ हेक्टरपैकी एक लाख १९ हजार ७६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांच्या अपूर्ण कामांसाठी तीन हजार १४२ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.
  • अपूर्ण कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळवण्यात राजकीय रेटा कमी पडत असल्यामुळे कामे सध्या ठप्प आहेत. शासनाकडून निधी वेळेत मिळत नसल्यामुळे ठेकेदारांनी कामे गतीने पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

टेंभू योजनेत ३३४ गावांचा समावेशतालुका - लाभार्थी गावे - सिंचन क्षेत्र हेक्टरमध्ये

  • कराड - ३ - ६००
  • माण - १९ - ५६८६
  • खटाव - ३० - ७४४०
  • कडेगाव - ३९ - ९३२५
  • खानापूर - ६१ - २४६४६
  • तासगाव - ४३ - १४५२६
  • आटपाडी - ६० - २१२९४
  • क.महांकाळ - ३४ - १२१२७
  • जत - ०४ - २६३६
  • सांगोला - ४१ - २३१९५