शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आरटीओ कार्यालयातच केला हळदीचा सौदा, सांगलीत अहमदनगरच्या शेतकऱ्याला अडविल्याने आंदोलन

By शरद जाधव | Updated: April 12, 2023 17:37 IST

वाहनात जादा माल व विमा संपल्याचे सांगत अधिकाऱ्याने ३० हजार रूपयांचा दंड केला

सांगली : अहमदनगर जिल्ह्यातून सौद्यासाठी हळद घेऊन आलेल्या शेतकऱ्याला आरटीओने अडवून ३० हजार रूपयांचा दंड केल्याबद्दल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. सावळी येथील आरटीओ कार्यालयातच हळदीचे पोते पालथे करत सौदा करा आणि त्यातून पैसे घ्या, तुम्हाला पगार कमी पडला आहे, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर अधिकारी वरमले हाेते.अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी तालुक्यातील शिवाजीराव यादवराव वने हळद घेऊन सांगलीत सौद्यासाठी येत होते. सावळी येथे ते आले असता, महिला अधिकाऱ्याने त्यांना अडवून वाहन ओव्हरलोड असल्याचे सांगितले. वाहनाचे वजन करावे लागेल, असे म्हणत त्या वाहन घेऊन गेल्या, तर शेतकरी वने रिक्षा करून तिथे गेले. तेथे वाहनात जादा माल असल्याचे लक्षात आले व त्या वाहनाचा विमाही संपल्याचे अधिकाऱ्याने सांगत वने यांना ३० हजार रूपयांचा दंड केला.या प्रकाराने गोंधळलेल्या वने यांनी हा प्रकार खोत यांना सांगितला. यावर खोत यांनी सावळी येथील आरटीओ कार्यालय गाठत हळदीची पोती रिकामी करत सौदा पुकारला. या सौद्यातून आरटीओंना पैसे द्यायचे आहेत, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना सरकार आवरणार का?राज्यातील शेतकरी अगोदरच निसर्गाच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यात अशी अडवणूक होत असल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना सरकार आवरणार आहे की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत Rto officeआरटीओ ऑफीसFarmerशेतकरी