शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोदींप्रमाणे कृष्णेतही डुबकी मारा, सांगलीवाडीत घाट सुशोभीकरणप्रसंगी जयंत पाटलांची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 14:37 IST

पुराची तीव्रता कमी होण्यासाठी कृष्णेतील पाणी गतीने पुढे सरकण्याची गरज आहे. त्यासाठी सांगलीतील बंधाऱ्यासह म्हैसाळपर्यंतचे नदीतील सर्व अडथळे हटविणार

सांगली : पुराची तीव्रता कमी होण्यासाठी कृष्णेतील पाणी गतीने पुढे सरकण्याची गरज आहे. त्यासाठी सांगलीतील बंधाऱ्यासह म्हैसाळपर्यंतचे नदीतील सर्व अडथळे हटविणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. सांगलीवाडी येथे शंकरघाट सुशोभीकरण प्रसंगी ते बोलत होते.

सुमारे ५० लाख रुपये खर्चून घाटावर रॅम्प व संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. रॅम्पवरून बोटी नदीत उतरविणे आणि बाहेर काढता येतील अशी संकल्पना आहे. पाटील म्हणाले, म्हैसाळमध्ये सध्याचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हटवून सुमारे २५० कोटींचे बराज उभारणार आहे. त्यानंतर आयर्विन पुलापर्यंतचे सर्व अडथळे हटविले जातील. बराजमुळे म्हैसाळपासून मागे कसबे डिग्रजपर्यंत पाणीसाठा होईल.

सांगलीत वसंतदादांच्या स्मारकापासून, स्मशानभूमी व धरणापर्यंत चालत जाता येईल, असे बांधकामही लवकरच केले जाईल. सध्याच्या नव्या पुलामुळे पाण्याला अडथळा होणार नाही. त्याच्या खांबांनाही आयर्विनप्रमाणेच सुशोभित दगड असतील. कृष्णेवर संरक्षक भिंत बांधली, तर ४५ फुटांपर्यंत पाणी अडवता येईल. पुरावेळी लोकांना बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

कार्यक्रमाला महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, दिलीप पाटील, संजय बजाज, पद्माकर जगदाळे, हरिदास पाटील, राहुल पवार, अविनाश पाटील, विष्णू माने, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता ज्योती देवरे, प्रकाश पाटील, महाबळेश्वर चौगुले, संपत पाटील, जयश्री पाटील, अरुण थोरात, दिनेश बंदिवाडेकर, ओंकार कोळी, गजानन पाटील, वर्षा शिंदे, अभिजित कदम, अपर्णा कोळी आदी उपस्थित होते.

वसंतदादांच्या स्मारकाला मी निधी दिला

मंत्री पाटील म्हणाले, वसंतदादांच्या स्मारकासाठी निधी गोळा करण्याचे काम समितीद्वारे सुरू होते, पण समितीला कोण निधी देत नव्हते. आपल्या नेत्याच्या स्मारकासाठी वर्गणी गोळा करणे पटले नाही, म्हणून स्मारकासाठी मी अंदाजपत्रकात तरतूद केली. यापूर्वी अशी तरतूद केली जात नव्हती.

मोदींप्रमाणे कृष्णेतही डुबकी मारा

मंत्री पाटील म्हणाले, नदीकाठच्या परिसराचे सुशोभीकरण केले जाईल. चौपाटीवर गेल्यासारखे वाटेल. काही दिवसांपूर्वी काशी विश्वेश्वरासमोर गंगेत डुबकी मारायला कोणीतरी गेले होते, तशीच डुबकी येथेही मारण्याचा मोह होईल, अशी व्यवस्था करू.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील