शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

शिक्षण क्षेत्रासमोरील संकट भयावह, पी. साईनाथ यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:33 IST

नवे शिक्षण धोरण गरिबांना शैक्षणिक प्रवाहापासून दूर नेणारे

सांगली : महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील शाळा बंद केल्या जात असून अन्य शाळा, अंगणवाड्या, पोषण आहाराचे खासगीकरणही केले जात आहे. शिक्षण क्षेत्रासमोर यातून मोठे संकट उभे राहिले आहे. नवे शिक्षण धोरण गरिबांना शैक्षणिक प्रवाहापासून दूर नेणारे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रविवारी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांच्या पंचाहत्तरीनिमित्त कार्यगौरव समारंभ पार पडला. काठी, घोंगडे, पुष्पहार, मानपत्र देऊन त्यांचा सपत्निक गौरव करण्यात आला. ॲड. तेजस्विनी सूर्यवंशी, विद्या स्वामी यांच्या हस्ते प्रमिला गुरव यांना साडी, चोळी, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी साईनाथ यांच्यासह ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, आमदार अरुण लाड, डॉ. भारत पाटणकर, हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.साईनाथ म्हणाले की, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील एकूण १५ हजार शाळांपैकी १४ हजार ७८३ शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे २ लाखांवर गरीब मुले शिक्षणापासून दूर केली जातील. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत तोट्याच्या शाळा म्हणून त्यांना कुलूप लावले जाणार आहे. अन्य सरकारी शाळा, अंगणवाड्या, त्याठिकाणचा पोषण आहार यांचे खासगीकरण केले जाईल. शेतीशाळाही संपुष्टात आणल्या जात आहेत. प्राचीन ६४ कला व व्यवसाय प्रकारांचा नव्या शैक्षणिक धोरणात समावेश केला गेला. त्यात चौर्यकर्म, कोंबड्यांची झुंजही समाविष्ट आहे. त्याचेही शिक्षण सरकार देणार आहे का?संजय आवटे म्हणाले की, चळवळीतील जुन्या पिढीने नव्या पिढीची भाषा शिकून त्यांच्या मेंदूत प्रस्थापितांकडून केली जाणारी गडबड रोखली पाहिजे. त्यासाठी पुरोगामी सांस्कृतिक चळवळी विकसित झाल्या पाहिजेत. उद्याच्या पिढीपर्यंत भारताची सत्यगाथा पोहोचविण्याची जबाबदारी चळवळीतील कार्यकर्ते, संघटनांवर आहे. प्रा. डॉ. बाबूराव गुरव, डॉ. भारत पाटणकर यांच्यासारखे नेते या चळवळीला लाभले असल्याने राजकीय, सामाजिक भविष्य आश्वासक वाटते.यावेळी संपतराव पवार, ॲड. अजित सूर्यवंशी, ॲड. सुभाष पाटील, व्ही. वाय. पाटील, विकास मगदूम आदी उपस्थित होते. अरुण लाड यांनी स्वागत, कॉ. धनाजी गुरव यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण शिंदे, सारिका माळी यांनी सूत्रसंचालन केले.

चळवळ शेवटच्या श्वासापर्यंतसत्काराला उत्तर देताना बाबूराव गुरव म्हणाले, हा सत्कार संस्मरणीय तसेच पुढील वाटचालीसाठी बळ देणारा आहे. भविष्यात अधिक जाेमाने चळवळीत काम करू. नव्या पिढीत चांगल्या विचारांची पेरणी करण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत करू.

..तर ४० वर्षांपर्यंत योजना चालतीलसाईनाथ म्हणाले, भारतात १९९१ मध्ये एकही डॉलर अरबपती नव्हता. आता अशा अरबपतींची संख्या २१७ इतकी झाली असून देशाच्या जीडीपीचा एकतृतीयांश हिस्सा आता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या वेल्थ टॅक्स म्हणजे श्रीमंतीवर २ टक्के कर लावला तरी रोहयो पुढील ४० वर्षे, मध्यान्ह भोजन योजना २५ वर्षे विनासायास चालेल. ५ टक्के कर घेतला तर देशातील संपूर्ण सार्वजनिक आरोग्य यंत्रणा नव्याने सक्षमपणे उभी राहील.

टॅग्स :SangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा