शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
3
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
4
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
5
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
6
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
7
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
8
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
9
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
10
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
11
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
13
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
14
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
15
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
16
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
17
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
18
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
19
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
20
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

सांगलीतील दिग्गज नेत्यांची पोकळी भरून काढण्याचे युवा नेत्यांपुढे आव्हान

By हणमंत पाटील | Published: February 07, 2024 5:04 PM

हणमंत पाटील सांगली : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून पुर्वीचा सातारा जिल्हा म्हणजे आताचे सांगली हे क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र होते. भारताला ...

हणमंत पाटीलसांगली : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून पुर्वीचा सातारा जिल्हा म्हणजे आताचे सांगली हे क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारच्या माध्यमातून शिराळ्यातील बिलाशी गाव स्वतंत्र होते. याच स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीमुळे या भागातील भूमिपूत्र यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री झाले. पुढे केंद्रात जाऊन त्यांनी संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून यशस्वी राजकीय कारकिर्द केली.

सांगली जिल्ह्याच्या याच मातीतून राजकीय वारसा घेऊन माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व सहकार महर्षी राजारामबापू पाटील यांनी आपले आयुष्य समर्पित केले. हाच राजकीय वारसा पुढे शिराळा तालुक्यातील कोकरुडचे शिवाजीराव देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य ते विधान परिषदेच्या सभापतीपदाची हॅट्रिक केली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री म्हणून नक्षलवादी गडचिरोली जिल्हा दत्तक घेऊन, तसेच ग्रामविकासमंत्री झाल्यानंतर स्वच्छ्ता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सांगलीची छाप कायम ठेवली. त्यावेळी आर. आर. आबा यांच्या सांगलीचे आम्ही हे सांगताना प्रत्येक सांगलीकराचा उर भरून येत होता.पुढे वसंतदादा यांचे नातू मंत्री मदन पाटील यांनीही कार्यकर्त्यांचे संघटन करून राज्याच्या राजकारणावर सांगलीचा दबदबा कायम ठेवला होता. मात्र, आर. आर. आबा आणि मदन भाऊ या दोन्ही नेत्यांचे २०१५ साली आकली निधनाने जिल्ह्याची कधीही भरून न येणारी हानी झाली.आबा आणि भाऊंच्या जाण्याने सावरणाऱ्या सांगलीला आणखी एक झटका बसला २०१८ साली. दिलदार व उमद्या मनाचे नेते डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जाण्याने. साहेब कधीही मतदार संघापुरता विचार करणारे नेते नव्हते. त्यांनी भिलवडी, वांगी, कडेगांव, कडेपूर व पलूस परिसराचा कायापालट केलाच. पण त्याही पलिकडे जाऊन त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पुणे, मुंबई, दिल्ली ते परदेशात सांगलीकराना संधी मिळवून दिली. आबा आणि साहेब यांनी रात्रीचा दिवस करून राजकारणातील मंत्रीपदाच्या माध्यमातून सांगलीला समृध्द करण्यासाठी मोठे योगदान दिले. समर्पित भावनेने जनसेवा करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे आकाली निधन झाले. त्यामुळे सांगलीतील जनतेची नाळ अन् सर्वसामान्य जनतेचे भान असलेल्या नेत्याची मोठी पोकळी निर्माण झाली. तोपर्यंतच्या राज्याच्या राजकारणात राजकीय पक्ष वेगळे असलेतरी सांगलीचे जयंतराव पाटील यांच्यासह किमान तीन ते चार मंत्री सांगलीचे हमखास असायचे.

गेल्या सहा दशकापासून सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा कायम राहिला. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे काही अपवाद वगळता बहुतेक नेत्यांना राजकीय कौटुंबिक वारसा नव्हता. प्रत्येक नेता गावचा सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य ते आमदार आणि पुढे स्वकर्तृत्वावर मंत्री ते मुख्यमंत्री झाले होते. याच जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांच्या साखळीतील आणखी एक रत्न ३१ जानेवारीला निखले. ते म्हणजे दुष्काळासाठी वरदान ठरणारी, पण दिवास्वप्न वाटणारी टेंभूची योजना वास्तवात आणणारे अनिलभाऊ बाबर.विटयाजवळील गार्डी गावचे सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य ते सभापती, नागेवाडी येथील यशवंतराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष असा प्रदीर्घ अनुभव असलेले. ग्रामीण भागाची नाळ माहिती असलेले जिल्ह्यातील आमदार. विधानसभेतील २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असतानाही त्यांना अनेकदा मंत्रिपदाने हुलकावणी दिली. आता त्यांच्या अचानक जाण्याने सर्वसामान्य जनतेसह सांगली जिल्ह्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा ते शेवटचे नेते अनिल बाबर यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान आजच्या तरुण पिढीतील युवा नेत्यांपुढे आहे. त्यांनी केवळ राजकीय वारसादार न होता, या दिग्गज नेत्याचा सामाजिक कार्यासाठीचा त्याग आणि समर्पित भाव हे गुण घेतले तर सांगली जिल्ह्याचे भविष्य उज्ज्वल असेल, अशी आशा करुया.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण